मुरुड तालुक्यात नाचवल्या जातात मानाच्या शासन काठ्या...

चार दिवस जत्रेचा धुरळा... करोडोंची उलाढाल...


मुरुड(प्रतिनिधी संतोष रांजणकर): मराठी नववर्षाच्या पहिल्याच चैत्र महिन्यात मुरूडसह तालुक्यातील गावात चार दिवस जत्रेचा धुरळा उडाला आहे. या जत्रेत अजून ही मानाच्या शासन काठ्या नाचवण्याची परंपरा कायम आहे. या जत्रेत करोडोंची उलाढाल होत असते.


चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी मुरूडची ग्रामदेवता श्रीकोटेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्यापासुन या उत्सवाला सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी चैत्र पौर्णिमेला तेलवडे गावात जत्रा होते, तिसऱ्या दिवशी खार आंबोली व शेवटी शिघ्रे गावात जत्रा होते मुरुड, तेलवडे, खार अंबोली, शिघ्रे अशी चार गावांत सलग चार दिवस जत्रोत्सव भरवले जाते. या चैत्र महिन्यात शासन काठ्या नाचवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. आणि ती आजतागायत जपली जात आहे.


तालुक्यातील सुमारे १२ ते १५ गावातील शासन काठ्या या जत्रेत वाजत गाजत, नाचत येतात, जत्रेत आल्यावर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत असताना शासन काठी नाचवली जाते कधी एका हातावर घेऊन, कधी खांद्यावर, कधी डोक्यावर, तर कधी हनुवटीवर हे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होत असते. ही काठी नाचवताना उंच उंच आभाळात अभिमानाने डौलत कधी जमीनीच्या दिशेने पडत असते त्यावेळी बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो आणि काठी सांभाळणारे पुन्हा काठी आभाळाच्या दिशेने उभी करून नाचवू लागतात हा चित्तथरारक अनुभव पहाणाऱ्यांना येत असतो.


या जत्रेमध्ये विविध स्टॉल लावले जातात मिठाई, भजी, कटलरी, आईस्क्रीम, उसाचा रस, सौंदर्य प्रसाधने, मोबाईल ॲक्सेसरी, मेहंदी गोंदवणे, नाव गोंदवणे, विविध प्रकारचे कपडे, चायनीज, विविध घरगुती सामान, विविध लहान मुलांचे खेळ त्यामुळे या जत्रेत मोठ्या उत्साहात लाखो लोक भेटदेत असतात त्यामुळे चार दिवसांत करोडोंची उलाढाल होत असते.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची