IPL 2024 Points Table: विजयासह दिल्ली कॅपिटल्सने पॉईंट्स टेबलमध्ये घेतली मोठी उडी

मुंबई: दिल्ली कॅपिटल्सला(delhi capitals) गुजरात टायटन्सविरुद्ध(gujrat titans) मिळालेल्या विजयाचा पॉईंट्स टेबलमध्ये खूप फायदा झाला आहे. ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला मात्र नुकसान सोसावे लागले. दिल्लीने अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. त्यासाठी ऋषभ पंतने कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने नाबाद ८८ धावा केल्या. तर अक्षऱ पटेलने अर्धशतक ठोकले.


आयपीएल २०२४चे पॉईंट्स टेबल पाहिले असता यात राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यांनी ८ सामने खेळलेत त्यापैकी ७ सामन्यात विजय मिळवला. राजस्थानकडे १४ गुण आहेत. कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहेत.


केकेआरने ७ सामने खेळले आहेत आणि ५ मध्ये विजय मिळवला आहे. त्यांच्याकडे १० गुण आहेत. सनरायजर्स हैदराबादची स्थितीही हीच आहे. त्यांचा नेट रनरेट केकेआरपेक्षा कमी आहे. याच कारणामुळे ते तिसऱ्या स्थानावर आहेत. लखनऊने ८ सामने खेळले आहेत त्यापैकी ५मध्ये विजय मिळाला आहे. ते चौथ्या स्थानावर आहेत.



दिल्लीला विजयामुळे मिळाला फायदा


दिल्लीचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आला आहे. त्यांनी ९ सामने खेळले आहेत त्यापैकी ४ मध्ये विजय मिळवला. त्यांचे ८ गुण आहेत. तर गुजरात ७व्या स्थानावर आहे. त्यांनीही ९ सामने खेळले आहेत त्यापैकी ४ सामन्यांत विजय मिळवला. मात्र दिल्लीचा नेट रनरेट गुजरातपेक्षा चांगला आहे.


चेन्नई सुपर किंग्सचा संघ पाचव्या स्थानावर आहे. मुंबईचा संघ ८व्या आणि पंजाबचा संघ ९व्या स्थानावर आहे. आरसीबीचा संघ सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात