पाटणा : बिहारची राजधानी पाटणा (Bihar News) येथील जंक्शनच्या अगदी समोर असलेल्या बहुमजली पाल हॉटेलमध्ये (Patna Pal Hotel) आज सकाळी भीषण आग लागली. सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली आणि अर्ध्या तासात संपूर्ण इमारत आग आणि धुराने भरून गेली. या आगीत सहा लोकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. अग्निशमन दल सध्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.
ही आग इतकी भीषण होती की, हॉटेलला लागून असलेल्या इमारतीपर्यंतही आग पोहोचली आणि दोन्ही इमारतींमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. लगतच्या पाटणा किरणालाही आगीचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. इमारतीसमोरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून, स्टेशन रोडही पूर्णपणे ठप्प झाला आहे. या आगीसमोर अग्निशमन दलाची व्यवस्था कमकुवत ठरत आहे.
आग लागल्यानंतर दीड तासानंतर एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अर्ध्या तासानंतर दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाटणा सेंट्रल रेंजचे टीएसपी सत्य प्रकाश यांनी या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. त्यात तीन महिला आणि तीन पुरुष आहेत. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सुमारे २० जण जखमी असून त्यांना पाटणा मेडिकल कॉलेजममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हॉटेलच्या किचनमध्ये लागलेली आग चार मजली इमारतीत पसरल्याचे स्थानिकांनी सांगितले. वरच्या मजल्यावर नाश्ता करणाऱ्या लोकांना त्याचा फटका बसला. या घटनेनंतर परिसरात घबराहट पसरली होती. आजूबाजूच्या हॉटेल आणि दुकानातील लोक रस्त्यावर आले. अग्निशमन दल बचाव कार्य आणि लोकांना बाहेर काढण्यात व्यस्त आहे. आतापर्यंत ४५ लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. तर काही लोकांनी इमारतीवरुन उड्या मारुन आपले प्राण वाचवले. या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…