Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयची कारवाई

ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर लादले निर्बंध


मुंबई : खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक समजल्या जाणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेवर (Kotak Mahindra Bank) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने बुधवारी कोटक महिंद्रा बँकेला तात्काळ प्रभावाने नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे थांबवण्याचे निर्देश दिले. याशिवाय, केंद्रीय बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर निर्बंध लादले आहेत. यामुळे बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


आरबीआयला कोटक महिंद्रा बँकेच्या आयटी प्रणालीमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. यावर बँकेकडून उत्तरही मागवण्यात आले होते, जे आरबीआयला समाधानकारक वाटले नाही. आता २०२२ आणि २०२३ च्या आयटी तपासणीनंतर रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.


सलग दोन वर्षे, बँकेने आयटी सुरक्षा कशी हाताळावी यावरील नियमांची पूर्तता केली नाही आणि या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितल्यानंतरही, बँकेने चांगले काम केले नाही. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ३५ए अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून, आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवर ही कारवाई केली आहे. मात्र, जे आधीच बँकेचे ग्राहक आहेत त्यांना पूर्वीप्रमाणेच सर्व सेवा मिळत राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या