Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयची कारवाई

  82

ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर लादले निर्बंध


मुंबई : खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक समजल्या जाणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेवर (Kotak Mahindra Bank) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने बुधवारी कोटक महिंद्रा बँकेला तात्काळ प्रभावाने नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे थांबवण्याचे निर्देश दिले. याशिवाय, केंद्रीय बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर निर्बंध लादले आहेत. यामुळे बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


आरबीआयला कोटक महिंद्रा बँकेच्या आयटी प्रणालीमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. यावर बँकेकडून उत्तरही मागवण्यात आले होते, जे आरबीआयला समाधानकारक वाटले नाही. आता २०२२ आणि २०२३ च्या आयटी तपासणीनंतर रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.


सलग दोन वर्षे, बँकेने आयटी सुरक्षा कशी हाताळावी यावरील नियमांची पूर्तता केली नाही आणि या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितल्यानंतरही, बँकेने चांगले काम केले नाही. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ३५ए अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून, आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवर ही कारवाई केली आहे. मात्र, जे आधीच बँकेचे ग्राहक आहेत त्यांना पूर्वीप्रमाणेच सर्व सेवा मिळत राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.