Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयची कारवाई

  93

ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर लादले निर्बंध


मुंबई : खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक समजल्या जाणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेवर (Kotak Mahindra Bank) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने बुधवारी कोटक महिंद्रा बँकेला तात्काळ प्रभावाने नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे थांबवण्याचे निर्देश दिले. याशिवाय, केंद्रीय बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर निर्बंध लादले आहेत. यामुळे बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


आरबीआयला कोटक महिंद्रा बँकेच्या आयटी प्रणालीमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. यावर बँकेकडून उत्तरही मागवण्यात आले होते, जे आरबीआयला समाधानकारक वाटले नाही. आता २०२२ आणि २०२३ च्या आयटी तपासणीनंतर रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.


सलग दोन वर्षे, बँकेने आयटी सुरक्षा कशी हाताळावी यावरील नियमांची पूर्तता केली नाही आणि या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितल्यानंतरही, बँकेने चांगले काम केले नाही. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ३५ए अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून, आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवर ही कारवाई केली आहे. मात्र, जे आधीच बँकेचे ग्राहक आहेत त्यांना पूर्वीप्रमाणेच सर्व सेवा मिळत राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )