Over Hydration: प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणेही आहे धोकादायक, व्हा सावध

मुंबई: शरीर गरम झाल्याने अथवा डिहायड्रेशन झाल्यास भरपूर पाणी प्यावेसे वाटत असेल तर एकत्र खूप पाणी पिऊ नका. ग्लासात पाणी घेऊन त्यात मीठ घाला. यामुळे वॉटर टॉक्सिसिटी होणार नाही.


उन्हाळ्याच्या दिवसांत घाम येत असल्याने तहानही खूप लागते. लोक डिहायड्रेशनपासून बचावासाठी सतत पाणी पित असतात. आरोग्य तज्ञही यावेळेत पाणी खूप पिण्याचा सल्ला देतात.मात्र अनेकदा तहान भागवण्यासाठी भरपूर पाणी पिणेही तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकते.


भरपूर पाणी पिण्याच्या सवयीमुळे प्राणही जाऊ शकतात. याला वॉटर टॉक्सिसिटी म्हणतात. यामुळे कधीही एकत्रित भरपूर पाणी पिऊ नये.


उन्हाळ्यात घाम खूप येत असल्याने शरीर डिहायड्रेट होते आणि सतत तहान लागते. ही तहान भागवण्यासाठी अनेकजण एक दोन ग्लास पाणी पिण्याऐवजी खूप पाणी एकदम पितात. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट बॅलन्स बिघडू लागतो आणि सोडियमचे प्रमाण अचानक कमी होते.


रक्तात सोडियमची कमतरता जाणवल्याने शरीरात सूज निर्माण होऊ शकते. याचा योग्य वेळी उपचार झाला नाही तर मृत्यूही ओढवू शकतो.


त्यामुळे भरपूर तहान जरी लागली असली तरी एकाच वेळेस भरपूर पाणी पिऊ नका. याशिवाय नारळपाणी, लिंबू पाणी, फ्रेश फ्रूट ज्यूस प्यायल्याने तहान भागते.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि