Over Hydration: प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणेही आहे धोकादायक, व्हा सावध

मुंबई: शरीर गरम झाल्याने अथवा डिहायड्रेशन झाल्यास भरपूर पाणी प्यावेसे वाटत असेल तर एकत्र खूप पाणी पिऊ नका. ग्लासात पाणी घेऊन त्यात मीठ घाला. यामुळे वॉटर टॉक्सिसिटी होणार नाही.


उन्हाळ्याच्या दिवसांत घाम येत असल्याने तहानही खूप लागते. लोक डिहायड्रेशनपासून बचावासाठी सतत पाणी पित असतात. आरोग्य तज्ञही यावेळेत पाणी खूप पिण्याचा सल्ला देतात.मात्र अनेकदा तहान भागवण्यासाठी भरपूर पाणी पिणेही तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकते.


भरपूर पाणी पिण्याच्या सवयीमुळे प्राणही जाऊ शकतात. याला वॉटर टॉक्सिसिटी म्हणतात. यामुळे कधीही एकत्रित भरपूर पाणी पिऊ नये.


उन्हाळ्यात घाम खूप येत असल्याने शरीर डिहायड्रेट होते आणि सतत तहान लागते. ही तहान भागवण्यासाठी अनेकजण एक दोन ग्लास पाणी पिण्याऐवजी खूप पाणी एकदम पितात. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट बॅलन्स बिघडू लागतो आणि सोडियमचे प्रमाण अचानक कमी होते.


रक्तात सोडियमची कमतरता जाणवल्याने शरीरात सूज निर्माण होऊ शकते. याचा योग्य वेळी उपचार झाला नाही तर मृत्यूही ओढवू शकतो.


त्यामुळे भरपूर तहान जरी लागली असली तरी एकाच वेळेस भरपूर पाणी पिऊ नका. याशिवाय नारळपाणी, लिंबू पाणी, फ्रेश फ्रूट ज्यूस प्यायल्याने तहान भागते.

Comments
Add Comment

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाचा प्रभावी उपयोग: ही ५ योगासने ठरतील लाभदायक

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहार आणि तणावमय दिनचर्येमुळे अनेक गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष