Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना भरसभेत आली भोवळ

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा आणि रॅली यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रचारसभांमुळे नेते मंडळीची देखील धावपळ होत आहे. त्यामध्ये उन्हाचा पारा राज्यामध्ये ४० अंश पार झाल्यामुळे सुर्य देखील आग ओकत आहे. याचा परिणाम राजकीय नेत्यांच्या आरोग्यावर देखील होताना दिसत आहे. परभणीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना भरसभेमध्ये भोवळ आली.


कडक उन्हाळ्यामध्ये भाजपाचे अमित शाह यांचा देखील अमरावतीमध्ये प्रचार दौरा आहे. यावेळी भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांना भोवळ आली. सदर घटना यवतमाळच्या पुसदमध्ये घडली. गडकरींना बोलता बोलता भोवळ आल्यामुळे प्रचारसभेच्या मंचावरील नेते, कार्यकर्ते तातडीने त्यांच्या मदतीला धावले.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना देखील उष्माघाताने चक्कर आली होती. धाराशिवमध्ये कडाक्याच्या उन्हामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रचाररॅली सुरु होती. रॅलीमध्येच त्यांना अचानक भोवळ आली. आमदार कैलास पाटील यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना उष्माघातामुळे हा त्रास झाला असल्याचे सांगण्यात आले. आता नितीन गडकरी यांना उन्हाचा त्रास झाला आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढलेला असताना राजकीय नेत्यांना प्रचार सभांचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा