Billionaires : जगातील अब्जाधीशांच्या यादीत मुंबई तिसऱ्या क्रमांकावर; 'या' १० शहरांमध्ये राहतात सर्वाधिक अब्जाधीश

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई आता आशियातील अब्जाधीशांची (Billionaires) राजधानी बनली आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२४ नुसार, मुंबईत ९२ अब्जाधीश राहतात. या बाबतीत मुंबई आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच मुंबईने बीजिंगला मागे टाकले आहे. देशाची राजधानी दिल्ली या यादीत ५७ अब्जाधीशांसह ९व्या क्रमांकावर आहे. आता मुंबईच्या पुढे फक्त न्यूयॉर्क आणि लंडन उरले आहेत.


मुंबईची तुलना अनेकदा दुबईशी केली जाते. मात्र या यादीत प्रगतीचे प्रतीक बनलेल्या दुबई शहराचा पहिल्या दहामध्येही समावेश नाही. तेथे फक्त २१ अब्जाधीश राहतात आणि दुबई जगात २८ व्या क्रमांकावर आहे. चीनची अधिकृत राजधानी बीजिंगमध्ये ९१ अब्जाधीश आहेत. चीनची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या शांघायमध्ये ८७ अब्जाधीश आहेत. शांघाय स्टॉक एक्स्चेंज हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टॉक मार्केट आहे. या यादीत हे शहर पाचव्या क्रमांकावर आहे.





दरम्यान, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारतातील अब्जाधीशही या प्रवासात आपले पूर्ण योगदान देत आहेत. मुंबई हे फक्त देशातील सर्वाधिक अब्जाधीशांचे घरच नाही तर सर्वाधिक ५००० स्टार्टअपही याच शहरात आहेत. हे शहर नवीन लोकांनाही पुढे जाण्याची पूर्ण संधी देत आहे. त्या तुलनेत दुबईमध्ये केवळ ३०० स्टार्टअप्स आहेत. मुंबईचा जीडीपी अंदाजे ३१० अब्ज डॉलर्स इतका आहे.



सर्वाधिक अब्जाधीश असलेली १० शहरे...



  • न्यूयॉर्क- ११९

  • लंडन- ९७

  • मुंबई- ९२

  • बीजिंग- ९१

  • शांघाय- ८७

  • शेनझेन- ८४

  • हाँगकाँग- ६५

  • मॉस्को- ५९

  • नवी दिल्ली- ५७

  • सॅन फ्रान्सिस्को- ५२


सर्वाधिक अब्जाधीश असलेले १० देश...



  • चीन- ८१४

  • अमेरिका- ८००

  • भारत- २७१

  • ब्रिटन- १४६

  • जर्मनी- १४०

  • स्वित्झर्लंड- १०६

  • रशिया- ७६

  • इटली- ६९

  • फ्रान्स- ६८

  • ब्राझील– ६४

Comments
Add Comment

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या

मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला केली मारहाण

बडोदा (वडोदरा) : बारावीच्या परीक्षेसाठी २० मिनिटे उशिराने आलेल्या मोहम्मद खान अन्सारीला शिक्षिकेने जाब विचारला.

नशीब पालटले! दूध आणि पेपर विकणाऱ्या रमेश बाबूंकडे आज ४०० आलिशान गाड्या, जाणून घ्या...

दिल्ली: परिस्थिती कशीही असो, करण्याची इच्छा असेल तर सगळं होतं म्हणतात ते खरं आहे. बेंगळुरूच्या रमेश बाबू यांचे

India -Malaysia Deal: भारत-मलेशियामध्ये प्रमुख करारांवर स्वाक्षरी; दोन्ही देशांचा होणार आर्थिक फायदा

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन