Lok Sabha Elections 2024: दुसऱ्या टप्प्यासाठी आज संपणार प्रचार, ८८ जागांवर २६ एप्रिलला मतदान

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीचे(voting) काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आज संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार संपेल. यानंतर २६ एप्रिलला १३ राज्यांतील ८८ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या जागांचे निकालही एकत्रित ४ जूनला जाहीर केले जातील. मतदान शांततेत आणि निष्पक्षपणे व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे.


दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यासाठी मतदानासाठी नाव मागे घेण्याची तारीख गेल्याने एकूण उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मेला १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधील ९५ जागांसाठी मतदान होणार आहे.



दुसऱ्या टप्प्यात कोणकोणत्या राज्यांमध्ये कोणत्या जागांवर मतदान


त्रिपुरा: त्रिपुरा पूर्व


जम्मू-काश्मीर: जम्मू लोकसभा


पश्चिम बंगाल: दार्जिलिंग, रायगंज आणि बालूरघाट


आसाम: दर्रांग-उदालगुरी, डिफू, करीमगंज, सिलचर आणि नौगांव


बिहार: किशनगंज, कटिहार, पूर्णिया, भागलपुर आणि बांका


छत्तीसगढ़: राजनांदगांव, महासमुंद आणि कांकेर


मध्य प्रदेश: टीकमगड, दमोह, खजुराहो, सतना, रीवा आणि होशंगाबाद


महाराष्ट्र: बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी


उत्तर प्रदेश: अमरोहा, मेरठ, बागपत, गाजियाबाद, गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगड आणि मथुरा


राजस्थान: टोंक-सवाई माधोपुर, अजमेर, पाली, जोधपुर, बाड़मेर, जालोर, उदयपुर, बांसवाडा, चित्तौडगढ, राजसमंद, भीलवाडा, कोटा आणि झालावाड-बारा


कर्नाटक: उडुपी-चिकमगळूर, हासन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकुर, मांड्या, मैसूर, चामराजनगर, बंगळुरू ग्रामीण, बंगळुरू उत्तर, बंगळुरू केंद्रीय, बंगळुरु दक्षिण,चिकबल्लापुर आणि कोलार


केरल: कासरगोड, कन्नूर, वडकरा, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम, पोन्नानी, पलक्कड़, अलाथुर, त्रिशूर, चलाकुडी, एर्णाकुलम, इडुक्की, कोट्टायम, अलाप्पुझा, मवेलिक्कारा, पथानमथिट्टा, कोल्लम, अट्टिंगल आणि तिरुअनंतपुरम

Comments
Add Comment

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००

सौदी अरेबियातील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू; भारतीय दूतावासाकडून शोकसंवेदना

सौदी अरेबियातील रियाध येथे १८ मार्च रोजी एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूबाबत भारतीय दूतावासाने

भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. इराणने

India-China Relations : भारत चीन संबंध अधिक दृढ होणार; बीजिंग आणि दिल्ली दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू

भारत आणि चीन दरम्यानची हवाई वाहतूक आता पूर्ववत होत आहे. नवी दिल्ली आणि चीनची राजधानी बीजिंग दरम्यानची विमानसेवा

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशच्या उंच भागांत शुक्रवारी (२० मार्च) जोरदार हिमवृष्टी तर खालच्या भागांत मुसळधार पाऊस झाला. लाहौल

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील