Lok Sabha Elections 2024: दुसऱ्या टप्प्यासाठी आज संपणार प्रचार, ८८ जागांवर २६ एप्रिलला मतदान

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीचे(voting) काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आज संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार संपेल. यानंतर २६ एप्रिलला १३ राज्यांतील ८८ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या जागांचे निकालही एकत्रित ४ जूनला जाहीर केले जातील. मतदान शांततेत आणि निष्पक्षपणे व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे.


दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यासाठी मतदानासाठी नाव मागे घेण्याची तारीख गेल्याने एकूण उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मेला १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधील ९५ जागांसाठी मतदान होणार आहे.



दुसऱ्या टप्प्यात कोणकोणत्या राज्यांमध्ये कोणत्या जागांवर मतदान


त्रिपुरा: त्रिपुरा पूर्व


जम्मू-काश्मीर: जम्मू लोकसभा


पश्चिम बंगाल: दार्जिलिंग, रायगंज आणि बालूरघाट


आसाम: दर्रांग-उदालगुरी, डिफू, करीमगंज, सिलचर आणि नौगांव


बिहार: किशनगंज, कटिहार, पूर्णिया, भागलपुर आणि बांका


छत्तीसगढ़: राजनांदगांव, महासमुंद आणि कांकेर


मध्य प्रदेश: टीकमगड, दमोह, खजुराहो, सतना, रीवा आणि होशंगाबाद


महाराष्ट्र: बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी


उत्तर प्रदेश: अमरोहा, मेरठ, बागपत, गाजियाबाद, गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगड आणि मथुरा


राजस्थान: टोंक-सवाई माधोपुर, अजमेर, पाली, जोधपुर, बाड़मेर, जालोर, उदयपुर, बांसवाडा, चित्तौडगढ, राजसमंद, भीलवाडा, कोटा आणि झालावाड-बारा


कर्नाटक: उडुपी-चिकमगळूर, हासन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकुर, मांड्या, मैसूर, चामराजनगर, बंगळुरू ग्रामीण, बंगळुरू उत्तर, बंगळुरू केंद्रीय, बंगळुरु दक्षिण,चिकबल्लापुर आणि कोलार


केरल: कासरगोड, कन्नूर, वडकरा, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम, पोन्नानी, पलक्कड़, अलाथुर, त्रिशूर, चलाकुडी, एर्णाकुलम, इडुक्की, कोट्टायम, अलाप्पुझा, मवेलिक्कारा, पथानमथिट्टा, कोल्लम, अट्टिंगल आणि तिरुअनंतपुरम

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा