DC Vs GT: शेवटच्या चेंडूवर दिल्लीचा विजय, अवघ्या ४ धावांनी गुजरातचा पराभव...

DC Vs GT: ऋषभ पंतने नाबाद ८८ धावांची खेळी केल्याने दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध ४ बाद २२४ अशी मोठी मजल मारली. पंत त्याच्या उत्कृष्ट खेळात होता आणि त्याने आपल्या अप्रतिम पॉवर हिटिंगच्या सहाय्याने मैदानात  गुजरातच्या गोलंदाजांना चोपले. पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने तीन विकेट गमावल्या, परंतु अक्षर पटेल आणि पंत यांनी ११३ धावांची खेळी दिल्लीला तारले. पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी स्लॉग ओव्हर्समध्ये डीसी इनिंगला अचूक फायनल पुश दिला आणि त्यामुळे गुजरातसमोर धावांचा डोंगर उभा राहिला.


गुजरातची फलंदाजांनी देखील आक्रमक खेळी करत त्या धावांचा पाठलाग केला, पण धावा जमवण्याच्या नादात गुजरातने विकेट गमावल्या. सातव्या नंबरवर आलेल्या राशीद खानने खेळाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत जोरदार झुंज दिली पण ती व्यर्थ गेली कारण दिल्ली कॅपिटल्सने येथे ४ धावांनी सामना जिंकला. रशीदने पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारले आणि त्यानंतर दोन चेंडु वाया गेले. अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडू राशीद खानने पाचव्या चेंडूवर षटकार खेचला ज्यामुळे अंतिम चेंडूवर ५ धावा शिल्लक होत्या. त्याने पुन्हा एकदा आपली बॅट जोरात फिरवली पण त्याला षटकार मारण्यात तो अपयशी ठरला. दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा फक्त ४ धावांनी पराभव केला.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या