Weight Loss: दररोज आवळा खा, १ महिन्यात लठ्ठपणा करा कमी

  81

मुंबई: वजन वाढताच अनेक आजारांचा धोकाही वाढतो. यामुळे फिटनेसवर मोठा परिणाम होतो. लोक यापासून बचावासाठी खाणे कमी करतात अथवा फिजीकल अॅक्टिव्हिटी वाढवतात. वजन कमी करण्यासाठी खाणे कमी करे तसेच घाम गाळणे या जुन्या पद्धती झाल्या. आता तुम्ही स्मार्ट पद्धतीने वेट लॉस करू शकता. योग्य आहार, कॅलरीजचे सेवन आणि सामान्य शारिरीक अॅक्टिव्हिटीच्या मदतीने तुम्ही १ महिन्यात वजन कमी करू शकता.


यात तुम्हाला आवळ्याची मदत होऊ शकते. आवळा चवीला तुरट असतो. त्यामुळे आवळ्याचा ज्यूस पिणे लोक पसंत करतात. मात्र ज्यूसमधून तुम्हाला फायबर मिळत नाही आणि वजनही कमी होत नाही. अशातच आवळ्याचा चहा जास्त फायदेशीर आहे.


यासाठी एका भांड्यात ४ कप पाणी, १ चमचा आवळा पावडर, एक चमचा सुंठ घालून उकळा. हे पाणी एक कप होत नाही तोपर्यंत उकळा. यानंतर एका ग्लासात काढून घ्या. यात थोडेसे काळे मीठ आणि मध मिसळा. डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे खूप चांगले आहे.


आवळ्यामध्ये क्रोमियम आढळते जे जेवणानंतर वाढणाऱ्या शुगरला रोखते. डायबिटीजमध्ये हे अतिशय फायदेशीर असते. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. यात अँटीऑक्सिडंटही असतात जे चेहऱ्याची चमक वाढवण्यास मदत करतात. तसेच रक्तसुधारणाही होते.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे