Bank Holidays : मे महिन्यात 'या' दिवशी असणार बँका बंद, एकूण ११ दिवसांचा समावेश

  63

मुंबई : आगामी १ मे २०२४ पासून नवीन आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या महिन्याला सुरुवात होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मे महिन्यात येणाऱ्या बँक हॉलिडेचे कॅलेंडर जारी केले आहे. शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांसह विविध राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि इतर प्रसंगांशी संबंधित सुट्ट्या देखील बँकेच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मे महिन्यात एकूण ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बँकेच्या सुट्टीची यादी एकदा तपासून पहा.


आगामी मे महिन्यात अनेक सण असल्यामुळे पुढच्या महिन्यांतील सुट्ट्यांची संख्या जास्त आहे. आगामी महिन्यात कामगार दिन आहे, त्यानंतर रविंद्रनाथ टागोर, नझरुल यांची जयंती आहे. अक्षय्य तृतीयादेखील आहे. त्यामुळे संपूर्ण देशात बँका साधारणपणे ११ दिवस बंद असतील.



काही सुट्ट्या त्या-त्या राज्यांपुरत्या मर्यादित


मे महिन्यात बँका एकूण अकरा दिवस बंद असल्या तरी या दिवसांत ऑनालाईन बँकिंगची सुविधा चालू असणार आहे. इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांची कामे करता येतील. काही सुट्ट्या या त्या-त्या राज्यांपुरत्या मर्यादित आहेत. त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवसांत बदल होऊ शकतो.



'या' दिवशी असणार बँका बंद


१ मे - महाराष्ट्र दिन, कामगार दिन
५ मे - रविवार
८ मे - रविंद्रनाथ टागोर यांची जयंती (पश्चिम बंगाल)
१० मे - बसव जयंती (कर्नाटक)
११ मे - दुसरा शनिवार
१२ मे - रविवार
१६ मे -स्टेट डे (सिक्कीम)
१९ मे - रविवार
२३ मे - बुद्ध पौर्णिमा
२५ मे - नझरुल जयंती, चौथा शनिवार
२६ मे - रविवार

Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल

काळू धरणातील विस्थापितांचे पुनर्वसन खापरी गावात नको

स्थानिक ग्रामस्थांचे मुरबाड तहसीलदारांना निवेदन मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.