Lok Sabha Elections 2024: उष्णतेच्या लाटेमुळे मतदान होणार कमी? निवडणूक आयोगाने नेमली टास्क फोर्स

मुंबई: कडक उन्हाळा आणि उष्णतेच्या लाटांमध्येच होत असलेली लोकसभा निवडणूक २०२४ लक्षात घेता निवडणूक आयोगाने सोमवारी एका टास्क फोर्सची स्थापना केली. ही समिती उन्हामुळे निवडणुकीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करेल. या टास्क फोर्समध्ये निवडणूक आयोग, भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती निवारण विभाग आणि आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा समावेश असेल.


निवडणूक आयोगानुसार हा टास्क फोर्स प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या पहिल्या पाच दिवसांतील उन्हाळा तसेच उष्णतेच्या लाटांचा अभ्यास करेल.निवडणूक आयोगाकडून हे पाऊल अशावेळेस उचलले जात आहे जेव्हा भारताच्या अनेक भागांमध्ये रविवारी भीषण उन्हामुळे तापमान प्रचंड वाढले आहे. अनेक ठिकाणी तर तापमान हे सामान्य तापमानापेक्षा ४ ते सहा डिग्री सेल्सियस अधिक मोजले गेले.


आयएमडीच्या माहितीनुसार ओडिशा, रायलसीमा, गांगेल पश्चिम बंगाल, झारखंड, विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील काही भागांमध्ये कमाल तापमान ४२ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान मोजले गेले. बिहार, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पाँडिचेरी आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये कमाल तापमान ४० ते ४२ डिग्री सेल्सियसदरम्यान होते.


या महिन्यात उष्णतेची लाट येण्याची दुसरी वेळ आहे. पहिल्या भागात ओडिशा, झारखंड, गांगेय पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरातच्या काही भागांमध्ये जबरदस्त उन्हाची लाट आली होती. अल निनोची कमकुवत स्थितीदरम्यान हवामान विभागाने आधी एप्रिल ते जून या कालावधीदरम्यान अधिकाधिक उष्णतेचा इशारा दिला होता.


एप्रिलमध्ये देशाच्या विविध भागात चार ते आठ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक उष्णतेची लाट असणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यात मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा, आंध्र प्रदेश, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, बिहार आणि झारखंड आहे.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना