Surat Loksabha : भाजपच्या '४०० पार मिशन'ला दणक्यात सुरुवात! सुरतमध्ये उघडलं खातं

मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय


सुरत : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. भाजप (BJP) आपल्या '४०० पार' मिशनसाठी कंबर कसून तयारी करत आहे. त्यातच भाजपने सुरतमध्ये (Surat Loksabha) आपलं खातं उघडून दणक्यात सुरुवात केली आहे. भाजपचे सुरतमधील उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) यांचा बिनविरोध विजय झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्याआधीच भाजपाने आपला विजय पक्का करण्यास सुरुवात केली आहे.


काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभणी यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने आणि रिंगणातील इतर सर्व उमेदवारांनी या जागेसाठी आपली बोली मागे घेतल्याने मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले. सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दलाल यांना संसद सदस्य (एमपी) प्रमाणपत्र दिले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दलाल यांचे अभिनंदन करत म्हटले की, निवडणूकपूर्व विजय म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या “ऐतिहासिक विजयाची सुरुवात” आहे.


दलाल आणि कुंभानी यांच्याशिवाय सुरत लोकसभा जागेसाठी आणखी आठ दावेदार होते. बहुजन समाज पक्षाचे (BSP) प्यारेलाल भारती हे सुरत जागेसाठीच्या लढतीतून माघार घेणारे शेवटचे उमेदवार होते.



का रद्द झाले काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज?


निवडणूक अधिकाऱ्यांनी काल नीलेश कुंभणी यांचा उमेदवारी अर्ज ‘साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केलेल्या लोकांच्या बनावट सह्या’ या कारणावरून रद्द केला. सुरतमधील काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचा उमेदवारी अर्जही अवैध ठरला आणि गुजरातच्या प्रमुख विरोधी पक्षाला शहरातील निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावे लागले. त्यांच्या आदेशात, निवडणूक अधिकारी सौरभ पारधी यांनी सांगितले की, कुंभणी आणि पडसाला यांनी सादर केलेले चार अर्ज फेटाळण्यात आले कारण प्रथमदर्शनी, प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आली. त्या सह्या बनावट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द आदेशात लिहिले आहे.

Comments
Add Comment

निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी १२ पर्यायी ओळखपत्रे मंजूर

नवी दिल्ली  : देशभरातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे निर्देश जारी केले

सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला; फोर्ब्स इंडियाची यादी जाहीर

नवी दिल्ली : हरियाणा हिसारच्या आमदार आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल या फोर्ब्स इंडियाच्या २०२५

बिहारसाठी ‘एनडीए’चे जागावाटप

विधानसभेच्या २४३ जागांमध्ये १०१ जेडीयू , १०० भाजप , २९ लोजप (आर), ७ हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ राष्ट्रीय लोक

कैद्यांना तुरुंगात मतदानाचा हक्क मिळणार?

केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस नवी दिल्ली : तुरुंगात असलेल्या विचाराधीन

फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

नवी दिल्ली : २० ऑक्टोबर रोजी भारत आणि जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर

पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांना विशेष फायदा

मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती मुंबई : पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, राष्ट्रीय डाळी अभियान तसेच कृषी