IPL 2024: एका धावेने RCBचा पराभव, रोमहर्षक सामन्यात केकेआरचा विजय

Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या(indian premier league 2024) ३६व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एका धावेने हरवले. रविवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात आरसीबीला विजयासाठी २२३ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र त्यांचा संपूर्ण संघ २० षटकांत २२१ धावांवर बाद झाला. आरसीबीचा हा सलग सहावा पराभव आहे. तर कोलकाताचा सात सामन्यांपैकी पाचवा विजय आहे.

या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये आरसीबीला विजयासाठी २१ धावा हव्या होत्या. मिचेल स्टार्कच्या त्या ओव्हरमध्ये कर्ण शर्माने तीन षटकार लगावले. दरम्यान पाचव्या बॉलवर कर्णला मिचेल स्टार्कने कॉट अँड बोल्ड आऊट केले. आरसीबीला एका बॉलवर तीन धावा हव्या होत्या मात्र लॉकी फर्ग्युसन दुसरी धाव घेण्याच्या नादात रनआऊट झाला. जर फर्ग्युसन दुसरी धाव घेण्यात यशस्वी ठरला असता तर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला असता.

जॅक्स-रजतचे अर्धशतक

आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात चांगली झाली नाही आणि ३५ धावांपर्यंत त्यांनी विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची विकेट गमावली होती. यानंतर विल जॅक्स आणि रजत पाटीदार यांनी शतकी भागीदारी करत आरसीबीला सामन्यात परतवले. जॅक्स आणि पाटीदार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी झाली. जॅक्सने ४ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ३२ बॉलमध्ये ५५ धावा केल्या. तर पाटीदारने केवळ २३ बॉलमध्ये ५२ धावांची खेळी केली. पाटीदारने आपल्या खेळीदरम्यान ३ चौकार आणि पाच षटकार लगावले.

जॅक्स बाद झाल्यानंतर कोलकाताने सामन्यात पुनरागमन केले आणि आरसीबीचा संघ एका वेळेस सहा बाद १५५ धावा होत्या. सुयश प्रभूदेसाई आणि दिनेश कार्तिक यांच्यात ३२ धावांची पार्टनरशिप झाली. त्यामुळे सामना रोमहर्षक झाला. कार्तिक-प्रभूदेसाई बाद झाल्यानंतर असे वाटत होते की कोलकाता आरामात जिंकेल मात्र शेवटच्या षटकांत कर्ण शर्माने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले. कोलकाताने आंद्रे रसेलने सर्वाधिक तीन विकेट मिळवल्या.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

1 hour ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

1 hour ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

2 hours ago