IPL 2024: एका धावेने RCBचा पराभव, रोमहर्षक सामन्यात केकेआरचा विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या(indian premier league 2024) ३६व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एका धावेने हरवले. रविवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात आरसीबीला विजयासाठी २२३ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र त्यांचा संपूर्ण संघ २० षटकांत २२१ धावांवर बाद झाला. आरसीबीचा हा सलग सहावा पराभव आहे. तर कोलकाताचा सात सामन्यांपैकी पाचवा विजय आहे.


या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये आरसीबीला विजयासाठी २१ धावा हव्या होत्या. मिचेल स्टार्कच्या त्या ओव्हरमध्ये कर्ण शर्माने तीन षटकार लगावले. दरम्यान पाचव्या बॉलवर कर्णला मिचेल स्टार्कने कॉट अँड बोल्ड आऊट केले. आरसीबीला एका बॉलवर तीन धावा हव्या होत्या मात्र लॉकी फर्ग्युसन दुसरी धाव घेण्याच्या नादात रनआऊट झाला. जर फर्ग्युसन दुसरी धाव घेण्यात यशस्वी ठरला असता तर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला असता.



जॅक्स-रजतचे अर्धशतक


आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात चांगली झाली नाही आणि ३५ धावांपर्यंत त्यांनी विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची विकेट गमावली होती. यानंतर विल जॅक्स आणि रजत पाटीदार यांनी शतकी भागीदारी करत आरसीबीला सामन्यात परतवले. जॅक्स आणि पाटीदार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी झाली. जॅक्सने ४ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ३२ बॉलमध्ये ५५ धावा केल्या. तर पाटीदारने केवळ २३ बॉलमध्ये ५२ धावांची खेळी केली. पाटीदारने आपल्या खेळीदरम्यान ३ चौकार आणि पाच षटकार लगावले.


जॅक्स बाद झाल्यानंतर कोलकाताने सामन्यात पुनरागमन केले आणि आरसीबीचा संघ एका वेळेस सहा बाद १५५ धावा होत्या. सुयश प्रभूदेसाई आणि दिनेश कार्तिक यांच्यात ३२ धावांची पार्टनरशिप झाली. त्यामुळे सामना रोमहर्षक झाला. कार्तिक-प्रभूदेसाई बाद झाल्यानंतर असे वाटत होते की कोलकाता आरामात जिंकेल मात्र शेवटच्या षटकांत कर्ण शर्माने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले. कोलकाताने आंद्रे रसेलने सर्वाधिक तीन विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि