Heat Waves:उन्हात खूप वेळ राहात असाल तर होऊ शकतो कॅन्सर, असा करा बचाव

मुंबई: संपूर्ण देशभरात उष्णतेची मोठी लाट आली आहे. कडक उन्हामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे सर्वच लोक त्रस्त झाले आहेत. उन्हामुळे लोकांना उष्णतेच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. बरेचजण ड्रिहायड्रेशनचे बळी पडत आहेत. अशातच एका रिपोर्टनुसार उन्हामुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतो. या कॅन्सरला मेलानोमा कॅन्सर असेही म्हणतात. हा कॅन्सर शरीराच्या त्या अंगांमध्ये जास्त असतो ज्यावर सूर्याची किरणे पडतात.


कॅन्सर तज्ञांच्या मते कडक उन्हापासून स्वत:चा बचाव केला पाहिजे. अधिकाधिक स्वत:ला हायड्रेट कसे ठेवता येईल याची काळजी घेतली पाहिजे. सोबतच दुपारी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत प्रयत्न करा की उन्हात निघणार नाही.



या कारणामुळे होतो कॅन्सर


डॉक्टरांच्या माहितीनुसार कडक उन्हामुळे सकाळी ७ ते ९ दरम्यान घराबाहेर पडा. या दरम्यान व्हिटामिन डी मिळते. यानंतर जे ऊन असते ते नुकसानकारक असते. यामुळे शरीरास अधिक नुकसान होते.


सूर्यापासून निघणारी अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतो. सोबतच ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री तसेच रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांना स्किन कॅन्सरचा धोका अधिक असते. दरम्यान, भारतात दुसऱ्या देशांच्या तुलनेने स्किन कॅन्सरचा धोका कमी असतो. गोऱ्या लोकांना स्किन कॅन्सरचा धोका जास्त असतो.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर