पाच वर्षांत पाच मिनिटे देशासाठी वेळ काढा; मतदान करण्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे नागरिकांना आवाहन

Share

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी देशातील जनतेला मतदानासाठी वेळ काढण्याचे आवाहन केले आहे. मतदान हे घटनात्मक लोकशाहीत सगळ्यांत मोठे कर्तव्य आहे.त्यामुळे ही संधी गमावू नये असे त्यांनी म्हटले आहे. माय वोट माय व्हॉइस मिशनसाठी एका व्हिडिओ संदेशात सरन्यायाधीश म्हणाले की आपण जगातील सगळ्यांत मोठ्या लोकशाहीचे नागरिक आहोत.

देशाची घटना नागरिक म्हणून आपल्याला अनेक अधिकार देते. मात्र त्या बदल्यात आपल्याकडून कर्तव्यपालनाचीही ती अपेक्षा करते. या लोकशाहीत नागरिकाचे सगळ्यांत महत्वाचे कर्तव्य आहे ते म्हणजे मतदान करणे. त्यामुळे आपल्या महान मातृभूमीचे नागरिक म्हणून मतदान करण्याच्या आपल्या कर्तव्यापासून कोणीही दूर राहू नये असे माझे सर्वांना आवाहन आहे.दर पाच वर्षांतून आपण पाच मिनिटे आपल्या देशासाठी काढली पाहिजेत. हे करण्यायोग्य आहे ना अशी विचारणा करतच त्यांनी माझे मत माझा आवाज असे म्हटले आहे.

ते पुढे म्हणतात सरकार निवडण्यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा असतो. त्यामुळेच लोकांनी लोकांसाठी निवडलेले लोकांचे सरकार असे म्हटले जाते. पहिल्यांदा त्यांनी जेंव्हा मतदान केले होते त्या घटनेचे स्मरण केल्यानंतर सरन्यायाधीश म्हणाले की मत दिल्यानंतर बोटाला लागलेली शाई देशभक्ती आणि राष्ट्रासोबत जोडले गेल्याची भावना निर्माण करते. जेंव्हा मी वकिल होतो तेंव्हा कामाच्या निमित्ताने इकडे तिकडे जावे लागायचे. त्यावेळीही मतदानाचे कर्तव्य मी बजावले. ती संधी गमावली नाही.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादचे मुंबईला १४४ धावांचे आव्हान, क्लासेनची जबरदस्त खेळी

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…

14 minutes ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

19 minutes ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

27 minutes ago

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

34 minutes ago

दहशतवादी हल्ल्याने महाराष्ट्रावर पसरली शोककळा

डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…

43 minutes ago

CT Scan मुळे कर्करोग होऊ शकतो का? अमेरिकेतील एका नवीन अभ्यासात खुलासा

CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…

49 minutes ago