Maharashtra Weather: पुढील ७ दिवस 'या' ठिकाणी पावसाचा इशारा; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार!

तर मुंबईत असेल 'असं' वातावरण


मुंबई : राज्यातील अनेक भागांत तापमानात प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. एकीकडे सूर्य आग ओकत आहे तर दुसरीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आणखी काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील अनेक भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.



काही भागांमध्ये पावसाची शक्यता


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २१ आणि २२ एप्रिल रोजी कोकण गोव्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे. आगामी पाच ते सात दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यातच विदर्भातील कमाल तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.


सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.



मुंबईत असे राहणार तापमान


मुंबईसह किनारपट्टी भागात तापमानात घट दिसून आल्याचं पहायला मिळतं. यामुळे वाढत्या उकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सरासरी कमाल तापमान ३४ अंशांवर राहिलं आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरी ३९ तर मराठवाडा आणि विदर्भात कमाल पारा सरासरी ४२ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. मात्र मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

Ashadhi Wari 2026 : आषाढी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर; पुण्यात २ दिवस रंगणार भक्तीचा महोत्सव

पुणे : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगला आहे. संत ज्ञानेश्वर

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता