Elon Musk : इलॉन मस्क यांचा भारत दौरा अचानक रद्द!

२१ एप्रिल रोजी नियोजित दौऱ्यात करणार होते मोठी घोषणा


नवी दिल्ली : टेस्ला कंपनीचे (Tesla Company) मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क (Elon Musk) २१ आणि २२ एप्रिल रोजी भारताचा दौरा (India visit) करणार होते. १० एप्रिल रोजी इलॉन मस्क यांनी स्वत: याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान मस्क हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार होते आणि भारतात गुंतवणूक करण्यासंबंधी एक मोठी घोषणा करणार होते. परंतु हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मस्क हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी दोनदा भेटले होते. यावेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेनुसार ते भारतात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी भारतात २० ते ३० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर ही घोषणा होण्याची दाट शक्यता होती. पण, तुर्तास याबाबतची घोषणा त्यांनी पुढे ढकलली आहे.


इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक आणि ड्रायव्हरलेस कार निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. भारताने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची नीती राबवली आहे. त्याच भूमिकेतून भारत सरकारने एक नवी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती नीतीची घोषणा केली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत इलेक्ट्रिक कार कंपन्यांना टॅक्समधून दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या दृष्टीकोनातून इलॉन मस्क यांचा भारत दौरा महत्त्वाचा होता.


मस्क यांचा दौरा रद्द होण्यामागचं कारण समजू शकलेलं नाही. नुकतेच, मस्क यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वाचे समर्थन केले होते.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात