Elon Musk : इलॉन मस्क यांचा भारत दौरा अचानक रद्द!

२१ एप्रिल रोजी नियोजित दौऱ्यात करणार होते मोठी घोषणा


नवी दिल्ली : टेस्ला कंपनीचे (Tesla Company) मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क (Elon Musk) २१ आणि २२ एप्रिल रोजी भारताचा दौरा (India visit) करणार होते. १० एप्रिल रोजी इलॉन मस्क यांनी स्वत: याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान मस्क हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार होते आणि भारतात गुंतवणूक करण्यासंबंधी एक मोठी घोषणा करणार होते. परंतु हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मस्क हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी दोनदा भेटले होते. यावेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेनुसार ते भारतात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी भारतात २० ते ३० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर ही घोषणा होण्याची दाट शक्यता होती. पण, तुर्तास याबाबतची घोषणा त्यांनी पुढे ढकलली आहे.


इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक आणि ड्रायव्हरलेस कार निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. भारताने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची नीती राबवली आहे. त्याच भूमिकेतून भारत सरकारने एक नवी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती नीतीची घोषणा केली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत इलेक्ट्रिक कार कंपन्यांना टॅक्समधून दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या दृष्टीकोनातून इलॉन मस्क यांचा भारत दौरा महत्त्वाचा होता.


मस्क यांचा दौरा रद्द होण्यामागचं कारण समजू शकलेलं नाही. नुकतेच, मस्क यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वाचे समर्थन केले होते.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला