Summer special: उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यावर क्रीम लावावी की नाही? घ्या जाणून

मुंबई: उन्हाळा(summer) येताच त्वचेसंबंधित समस्या सुरू होतात. अशातच अनेकजण यापासून बचावाचा प्रयत्न करतात. मात्र अनेकदा आराम मिळत नाही. बरेचजण उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यावर क्रीमचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का चेहऱ्यावर क्रीम लावणे उन्हाळ्याच्या दिवसांत चांगले असते की नाही ते. जर तुम्हाला हे माहीत नाही तर आण्ही या लेखात याबद्दल सांगत आहोत...



चेहऱ्यावर क्रीम लावणे योग्य?


उन्हाळ्यात त्वचेची देखभाल करणे थोडे कठीण असे. कडक उन्हामुळे सतत घाम येत असतो. यामुळे आपली त्वचा काळवंडते. अशातच चेहऱ्यावर क्रीम लावणे फायदेशीर ठरू शकते. तर काही लोकांना यामुळे नुकसानही होऊ शकते. उन्हाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. यापासून बचावासाठी तुम्ही चेहऱ्यावर क्रीम लावू शकता. मात्र काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.



या गोष्टींची घ्या काळजी


क्रीम धूळ आणि घाणीपासून त्वचेला वाचवण्याचे काम करते. मात्र लक्षात ठेवा की उन्हाळ्याच्या दिवसात खूप क्रीमचा वापर करू नका. यामुळे चेहऱ्यावर पुटकुळ्या आणि पिंपल्स येऊ शकतात. त्वचेच्या हिशेबाने क्रीमचा वापर करा. अनेकदा तेलकट त्वचेवर काही क्रीम सूट करत नाहीत यामुळे पिंपल्स आणि चेहरा आणखी तेलकट दिसू लागतो.



तेलकट त्वचेवरील उपचार


जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ऑईल फ्री क्रीम अथवा जेलचा वापर केला पाहिजे. जेव्हा क्रीमची निवड करा तेव्हा त्याच्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या. कोणत्याही नव्या क्रीमचा वापर करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट जरूर करा. चेहरा दिवसांतून २ ते ३ वेळा थंड पाण्याने जरूर धुवा.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण