Summer special: उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यावर क्रीम लावावी की नाही? घ्या जाणून

मुंबई: उन्हाळा(summer) येताच त्वचेसंबंधित समस्या सुरू होतात. अशातच अनेकजण यापासून बचावाचा प्रयत्न करतात. मात्र अनेकदा आराम मिळत नाही. बरेचजण उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यावर क्रीमचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का चेहऱ्यावर क्रीम लावणे उन्हाळ्याच्या दिवसांत चांगले असते की नाही ते. जर तुम्हाला हे माहीत नाही तर आण्ही या लेखात याबद्दल सांगत आहोत...



चेहऱ्यावर क्रीम लावणे योग्य?


उन्हाळ्यात त्वचेची देखभाल करणे थोडे कठीण असे. कडक उन्हामुळे सतत घाम येत असतो. यामुळे आपली त्वचा काळवंडते. अशातच चेहऱ्यावर क्रीम लावणे फायदेशीर ठरू शकते. तर काही लोकांना यामुळे नुकसानही होऊ शकते. उन्हाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. यापासून बचावासाठी तुम्ही चेहऱ्यावर क्रीम लावू शकता. मात्र काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.



या गोष्टींची घ्या काळजी


क्रीम धूळ आणि घाणीपासून त्वचेला वाचवण्याचे काम करते. मात्र लक्षात ठेवा की उन्हाळ्याच्या दिवसात खूप क्रीमचा वापर करू नका. यामुळे चेहऱ्यावर पुटकुळ्या आणि पिंपल्स येऊ शकतात. त्वचेच्या हिशेबाने क्रीमचा वापर करा. अनेकदा तेलकट त्वचेवर काही क्रीम सूट करत नाहीत यामुळे पिंपल्स आणि चेहरा आणखी तेलकट दिसू लागतो.



तेलकट त्वचेवरील उपचार


जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ऑईल फ्री क्रीम अथवा जेलचा वापर केला पाहिजे. जेव्हा क्रीमची निवड करा तेव्हा त्याच्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या. कोणत्याही नव्या क्रीमचा वापर करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट जरूर करा. चेहरा दिवसांतून २ ते ३ वेळा थंड पाण्याने जरूर धुवा.

Comments
Add Comment

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन