PBKS vs MI: मुंबईचा ९ धावांनी रोमहर्षक विजय, पंजाबला त्यांच्यात घरात हरवले

मुंबई: मुंबई इंडियन्सने रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सला ९ धावांनी हरवले. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९२ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवच्या जबरदस्त अर्धशतकामुळे मुंबईला मोठा स्कोर गाठता आला. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब संघाची सुरूवात खराब झाली.


कारण जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्जीने आपल्या स्पेलमध्ये घातक गोलंदाजी करताना पंजाबचा स्कोर ४ बाद १४ असा केला होता. शिखर धवनच्या अनुपस्थितीत संघाची पहिली फळी पूर्णपणे कोसळली होती. जसप्रीत बुमराहने सामन्यात ३ विकेट घेत पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.


पंजाबकडून सर्वाधिक धावा आशुतोष शर्माने बनवल्या. आशुतोषने २८ बॉलमध्ये ६१ धावा ठोकल्या होत्यात. यात २ चौकार आणि ७ षटकारांसाह समावेश आहे. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.


शेवटच्या ६ षटकांत पंजाब किंग्सला विजयासाठी ६५ धावा हव्या होत्या. मात्र त्यांच्या हातात केवळ ३ विकेट होत्या. दुसऱ्या बाजूला आशुतोष शर्मा क्रीझवर टिकून होता. तो तुफानी अंदाजात फलंदाजी करत होता. १६व्या षटकांत त्यांनी २४ धावा काढल्या. यावरून सामना फिरला. आता पंजाबला २४ बॉलमध्ये २८ धावांची गरज होती. १८व्या षटकांत आशुतोषची विकेट पडली. शेवटची २ षटके बाकी होती तेव्हा पंजाबला २३ धावांची गरज होती. जेव्हा हरप्रीत ब्रार २० बॉलमध्ये २१ धावा करून बाद झाला तेव्हा पंजाबच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. तर रबाडा बाद होताच पंजाबचा संघ १८३ धावांवर ऑलआऊट झाला.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख