PBKS vs MI: मुंबईचा ९ धावांनी रोमहर्षक विजय, पंजाबला त्यांच्यात घरात हरवले

  54

मुंबई: मुंबई इंडियन्सने रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सला ९ धावांनी हरवले. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९२ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवच्या जबरदस्त अर्धशतकामुळे मुंबईला मोठा स्कोर गाठता आला. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब संघाची सुरूवात खराब झाली.


कारण जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्जीने आपल्या स्पेलमध्ये घातक गोलंदाजी करताना पंजाबचा स्कोर ४ बाद १४ असा केला होता. शिखर धवनच्या अनुपस्थितीत संघाची पहिली फळी पूर्णपणे कोसळली होती. जसप्रीत बुमराहने सामन्यात ३ विकेट घेत पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.


पंजाबकडून सर्वाधिक धावा आशुतोष शर्माने बनवल्या. आशुतोषने २८ बॉलमध्ये ६१ धावा ठोकल्या होत्यात. यात २ चौकार आणि ७ षटकारांसाह समावेश आहे. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.


शेवटच्या ६ षटकांत पंजाब किंग्सला विजयासाठी ६५ धावा हव्या होत्या. मात्र त्यांच्या हातात केवळ ३ विकेट होत्या. दुसऱ्या बाजूला आशुतोष शर्मा क्रीझवर टिकून होता. तो तुफानी अंदाजात फलंदाजी करत होता. १६व्या षटकांत त्यांनी २४ धावा काढल्या. यावरून सामना फिरला. आता पंजाबला २४ बॉलमध्ये २८ धावांची गरज होती. १८व्या षटकांत आशुतोषची विकेट पडली. शेवटची २ षटके बाकी होती तेव्हा पंजाबला २३ धावांची गरज होती. जेव्हा हरप्रीत ब्रार २० बॉलमध्ये २१ धावा करून बाद झाला तेव्हा पंजाबच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. तर रबाडा बाद होताच पंजाबचा संघ १८३ धावांवर ऑलआऊट झाला.

Comments
Add Comment

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा