Maharashtra Voting : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात आतापर्यंत किती टक्के मतदान?

जाणून घ्या आज कोणत्या ठिकाणी पार पडत आहे मतदान...


मुंबई : भारतात १९ एप्रिल २०२४ ते १ जून २०२४ या कालावधीत १८ व्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांची निवड करण्यासाठी सात टप्प्यांत सार्वत्रिक निवडणूक (Loksabha Election) होणार आहे. ४ जून २०२४ रोजी याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी आजपासून मतदानाचा (Voting) पहिला टप्पा सुरु झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रात विदर्भातील (Vidarbha) रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होत आहे.


देशातील १०२ जागांवर मतदान होणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. २१ राज्यांमध्ये १०२ मतदार संघात १६२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. सकाळी ७ वाजता मतदान सुरु झाले आहे तर ते संध्याकाळी ६ पर्यंत चालू असणार आहे.



आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ५४.८५ टक्के मतदान झालं आहे.


भंडार-गोंदिया - ५६.८७ % मतदान


चंद्रपूर - ५५.११% मतदान


गडचिरोली चिमूर - ६४.९५% मतदान


नागपूर - ४७.९१% मतदान


रामटेक - ५२.३८% मतदान


मतदान केंद्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आले आहेत. सर्वाधिक मतदान गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघात झालेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंतच मतदान असणार आहे. हा नक्षली भाग असल्याने वेळेची मर्यादा आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांसाठीही आज मतदान होत आहे.

Comments
Add Comment

Solapur News : सातारा जिल्ह्यातून परीक्षेसाठी सोलापुरात आलेली २२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

Chandrashekhar Bawankule : परप्रांतीयांच्या कोकणातील जमीन खरेदीची चौकशी

- विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती; बेकायदेशीर पद्धतीने खरेदी झालेल्या जमिनी सरकारजमा होणार मुंबई :

kharif pik vima : खरीप २०२६ पीक विम्यासाठी नवे नियम लागू; अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी या 5 गोष्टी जाणून घ्या

मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ साठी पीक विमा योजनेत (Crop Insurance) काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यंदा पीक विमा (Pik Vima)

Jalgaon : जळगाव-इंदूर विमानसेवेच्या हालचालींना पुन्हा वेग; डीजीसीएकडे तिसऱ्यांदा प्रस्ताव, लवकरच उड्डाणाची शक्यता

Jalgaon : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या जळगाव-इंदूर थेट विमानसेवेच्या

Narhari Zirwal : तुकाराम मुंडेंच्या कारवाईनंतर दूध संकलनात २५ टक्के घट

- मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली; विधानभवनात येणाऱ्या अन्नाचीही तपासणी होणार मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन

Mumbai News : मुंबईत दूध भेसळ प्रकरणावर FDA ची मोठी कारवाई; ४७० लिटर दूध जप्त करून नष्ट

मुंबई : मुंबईतील दहिसर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दूध भेसळीविरोधात मोठी कारवाई करत भेसळयुक्त दूध जप्त केले