राज्यात पहिल्या टप्प्यात ५४. ८५% मतदान, देशात ५९.७१ टक्के मतदारांनी बजावला हक्क

सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये तर सर्वात कमी मतदान हे बिहारमध्ये


मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची निवडणूक शुक्रवारी पार पडली आहे. काही घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले आहे. २१ राज्य आणि केंद्र शासित प्रशांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार पड़ले आहे. यापैकी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदान नोंदविले गेले आहे. या मतदारसंघांमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान घेण्यात येत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंतचे मतदान टक्केवारी आली आहे. देशात ५९.७१ टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रात पाच लोकसभा मतदारसंघात ५४. ८५% मतदान झाले.


सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले असून ७७.५७% मतदान झाले आहे. दुसरा क्रमांक त्रिपुरा राज्याचा असून ७६.१०% मतदान झाले आहे. मेघालय ६९.९१%, मध्य प्रदेश ६३.२५%, तामिळनाडू ६२.०८%, उत्तर प्रदेश ५७.५४%, बिहार ४६.३२%, उत्तराखंड ५३.५६%, जम्मू-कश्मीर ६५.०८%, राजस्थान ५०.२७%, छत्तीसगड ६३.४१%, आसाम ७०.७७%, पाँडिचेरी ७२.८४%, अरुणाचल प्रदेश ६४.०७%, नागालँड ५६.१८%,मिझोरम ५३.९६%, सिक्किम ६८.०६%, मणिपूर ६८.६२%, अंदमान निकोबार ५६.८७%, लक्षद्वीप ५९.०२%, महाराष्ट्र ५४.८५% एवढे मतदान झाले आहे.


सर्वात कमी मतदान हे बिहारमध्ये झालेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जास्त मतदान झाले तर सत्ताधाऱ्यांविरोधात मत गेल्याचे जाणकार सांगतात. २०१४ पेक्षा २०१९ मध्ये जास्त मतदान झाले होते. परंतु भाजपाचे सरकार पुन्हा आले होते. तर २००९ पेक्षा २०१४ मध्ये जास्त मतदान झाले होते. तेव्हा सत्तांतर झाले होते. यामुळे हे कमी झालेले मतदान कोणाच्या फायद्याचे हे ४ जुलैलाच समजणार आहे.



पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे -


रामटेक ५२.३८ टक्के
नागपूर ४७.९१ टक्के
भंडारा- गोंदिया ५६.८७ टक्के
गडचिरोली- चिमूर ६४.९५ टक्के
आणि चंद्रपूर ५५.११ टक्के

Comments
Add Comment

Monsoon : राज्यात २५ जूननंतर मान्सून सक्रीय होणार, हवामान खात्याचा नवा अंदाज

मुंबई : देशभरात मान्सूनच्या प्रगतीने पुन्हा एकदा मोठी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे. सलग तिसऱ्या वर्षी

Crime News : प्रेमासाठी मित्रानेच मित्राची केली हत्त्या ; मुलगी एक प्रियकर दोन अन् पुढे...

नवी मुंबई : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असत हे आजवर आपण ऐकत आलो आहे मात्र हे कधी सत्यात होताना पाहिलं आहे का?

Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस 'वर्षा'वर घेणार भाजप आमदारांची 'शाळा'

- प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मांडणार 'रिपोर्ट कार्ड'; पक्षीय कामात उदासीनता दाखवणाऱ्यांचे कान टोचणार मुंबई :

TET Exam 2026: TET परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा केंद्रावर लागू झाले नवे नियम

TET Exam 2026 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) यंदा अधिक कडक नियमांसह घेतली जाणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच जमा

राज्यात २० जून हा दिवस ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार- कृषी मंत्री दत्तात्रय

Murlidhar Mohol Father passes away : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक; आज पुण्यात अंत्यसंस्कार

पुणे: केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ