करी आठव वेड्या विसरू नको

Share

गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला

आशा कुलकर्णी, नागपूर यांना आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव. गजानन महाराज यांच्यावर माझी खूप भक्ती आहे. मी एका अशा समूहाची सदस्य आहे की, जिथे दर गुरुवारी संत दासगणू कृत गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचण्यासाठी आम्हाला पाठविण्यात येतो. तो अध्याय वाचून झाला की, त्या समूहाला कळवावे लागते. म्हणजे एकास पहिला अध्याय तर दुसऱ्याला दुसरा याप्रमाणे पठण करावयाचे असते. यालाच ‘साखळी पारायण’ असे म्हणतात.

एका गुरुवारी मला अध्याय वाचायचा होता. सकाळपासून अध्याय वाचायचा आहे, हे सारखे मनात सुरू होते. पण काही ना काही तरी कामानिमित्त मी अध्याय वाचायचा विसरून गेले. पाहा, माणसाचे कसे असते. बाकी सगळी कामे आटोपली होती. आता थोडा आराम करावा म्हणून मी थोडी पाठ टेकवली आणि मला झोप लागली. अध्याय वाचायचा राहिला आहे, हे माझ्या डोक्यातून पूर्णपणे निघून गेले. मी झोपले होते, त्यावेळेस अचानक मला असे जाणवले की, घरात कोणीतरी आले आणि मला म्हणाले की, “आज तू अध्याय वाचला आहेस का? विसरलीस ना? ऊठ” असे ऐकताच, मी झोपेतून खडबडून जागी झाले. आणि इकडे तिकडे पाहू लागले. पण मला तिथे कोणीच दिसले नाही. एकदम माझ्या लक्षात आले, अरे खरंच, आज मी अध्याय वाचलाच नाहीये म्हणून. मग मी पटकन उठले आणि समूहावर कळवले की, मी अध्याय वाचलेला आहे.

कारण समूहाची अध्याय पठणाची वेळ टळत आली होती म्हणून आधी कळवून, मग मी लगेच अध्याय वाचायला बसले. अध्याय पूर्ण झाल्यानंतरच मला शांत वाटले. मग मात्र माझ्या डोक्यात विचार सुरू झाले की, मी गाढ झोपेत असताना कोणीतरी माझ्या आसपास आहे आणि माझ्या कानाशी येऊन, असे सांगत आहेत की, तुझा अध्याय वाचायचा राहिला आहे. कुणी सांगितले असेल? कोणी मला आठवण करून दिली असेल? त्यावेळेला माझ्या असे लक्षात आले की, स्वतः महाराजांनी येऊन माझ्या कानाशी ते वाक्य उच्चारून, तेच आठवण करून देऊन, मला जागृत केले आणि महाराज अंतर्धान पावले. हा अनुभव लिहिताना मला खूप भरून आले आहे. अष्टभव दाटून आले आहेत. हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. महाराज इथेच आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या मागे नेहमीच उभे असतात. मनापासून सेवा करणाऱ्याला ते नेहमीच मदत करतात. जय गजानन महाराज … गण गण गणात बोते…

Recent Posts

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

10 minutes ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

28 minutes ago

अतिरेक्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू, ‘या’ दिवशी राज्यात येणार पार्थिव

मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…

30 minutes ago

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…

1 hour ago

OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अ‍ॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..

नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…

1 hour ago

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

2 hours ago