Bhutan Tour: भूतानची सैर करण्यासाठी IRCTCचे नवे पॅकेज

  59

मुंबई: आयआरसीटीसी(irctc) भूतानसाठी(bhutan) स्पेशल पॅकेज आणले आहे. आम्ही तुम्हाला या पॅकेजचे डिटेल्सबद्दल सांगणार आहोत.

भूतान आपल्या नैसर्गिक सुंदरतेबद्दल तसेच आपल्या विशेष संस्कृतीबद्दल संपूर्ण जगात फेमस आहे. जर तुम्हाला हिरव्यागार पर्वतांची सफर करायची आहे आयआरसीटीसी भूतानच्या पॅकेजमध्ये बुकिंग करू शकता.

या पॅकेजचे नाव Bhutan The Land Of Happiness Ex Delhi. हे एक फ्लाईट पॅकेज आहे. यात तुम्हाला दिल्लीवरून पारोची फ्लाईट मिळेल. यानंतर थिंपूला आणले जाईल.

या पॅकेजमध्ये तुम्ही थिंपूशिवाय पुनाका आणि पारोची सैर करण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये सर्व प्रवाशांना ३ स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळेल.

यासोबतच मीलमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर या तीनची सुविधा मिळेल. पॅकेजमध्ये इंग्लिश बोलणारा टूर गाईड मिळेल.

८० वर्षांपर्यंतच्या नागरिकांना ट्रॅव्हल इन्शुरन्सचा लाभ मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्ही भूतानच्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांची सैर करण्याचा लाभ मिळेल.

भूतानच्या या पॅकेजमध्ये तुम्हाला सिंगल ऑक्युपेन्सीला ९६ हजार रूपये प्रती व्यक्तीच्या हिशेबाने शुल्क द्यावे लागेल. तर डबल ऑक्युपेन्सीला ७९ हजार रूपये प्रती व्यक्ती आणि ट्रिपल ऑक्युपेन्सीला ७५ हजार रूपये प्रती व्यक्ती द्यावे लागेल.

या पॅकेजचा लाभ तुम्ही १ जून ते ६ जून २०२४दरम्यान उचलू शकता. पॅकेजची अधिक माहिती आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी