विधानसभेपर्यंत महायुती राहणार का? अजित पवार गटातील आमदारांच्या वक्तव्यानं खळबळ

Share

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप व शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेशी युती करण्याच्या घटनेला काही महिनेच झाले असताना लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र या दरम्यान महायुती टिकून राहावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो,असे वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.

मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसमोर शेळके यांनी हे वक्तव्य केले आहे. याबरोबरच महायुतीकडून बारणे यांचा प्रचार योग्य रित्या सुरु आहे का? याबाबत ही शेळकेंनी प्रश्न उपस्थित केले. तसेच मला ढकलून देण्याचे नियोजन करणाऱ्यांच्या खाली मी देखील सुरुंग लावून ठेवल्याचे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला ही डिवचले आहे. सुनील शेळके यांच्या या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

माझ्या आमदारकीच्या काळात मी जे भोगले आहे, ते पुढच्या पंचवीस वर्षात कोणाला अनुभवता येणार नाही, असे म्हणून गेल्या पाच वर्षातील फोडाफोडीचं राजकारण आपल्याला अजिबात आवडले नाही, असेही शेळके यांनी बोलून दाखवले. बारणेंच्या प्रचारात शेळके यांनी हे वक्तव्य केल्यामुळे महायुतीत समन्वय राखला गेलाय का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

मावळ लोकसभा मतदार समघातून उमेदवारी देण्यासाठी सुनील शेळके यांनी आपला विरोध दर्शवला होता. मतदारसंघातील पक्षाच्या ताकदीवर दीड लाखाच्या फरकानेउमेदवार निवडून येईलम असा उमेदवार मावळमध्ये असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानंतर शेळके त्यांच्या प्रचारात सहभागी होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. मात्र अजित पवारांच्या आदेशामुळे शेळके बारणेंच्या प्रचारात सक्रिय झाले. अजित पवार आमचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली, त्या भूमिकेसोबत आम्ही ठामपणाने उभे राहणार आहोत, असेही शेळके म्हणाले. महायुतीचा धर्म फक्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पाळावा, असे नाही तऱ शिवसेना, भाजप यांनीदेखील युतीचा धर्म पाळला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

एकुणच भाजप आणि शिंदे गट यांच्यासोबत अजित पवार यांनी केलेली युती शेळके यांना पटलेली दिसत नाही आणि श्रीरंग बारणे यांच्यासोबत आता जाणूनबूजून जुळवून घ्यावे लागत असल्याचे शेळके यांच्या वक्तत्व्यावरून वाटत आहे.

Recent Posts

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

52 minutes ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

3 hours ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

4 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

4 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

5 hours ago