Sion-Panvel Highway: वाहतूक कोंडीतून होणार मुंबईकरांची सुटका! शीव-पनवेल महामार्गाला जोडणार नवा पूल

पनवेल : खारघरमध्ये प्रवेश करण्यासाठी कोपरा येथील मार्ग सोयीस्कर ठरतो. मात्र, तेथून बाहेर पडण्यासाठी वापरण्यात येणारा कोपरा पूल धोकादायक ठरत आहे. सध्या त्याचा एकेरी मार्ग सुरु आहे. मात्र त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रांजणपाडा, ओवे, कोपरा गावातील रहिवाशांसाठी हा पूल सोयीचा असला तरी तो धोकादायक स्थितीत असल्यामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांना पनवेलकडे जाण्यासाठी दोन ते तीन किमी अंतराचा फेरा मारुन सायन-पनवेल महामार्गावर जावे लागते. यामुळे, अवघ्या काही सेकंदाचे अंतर कापण्यासाठी नागरिकांना बराच वेळ वाहतूककोंडीत अडकावे लागते. पण आता सिडकोने याबाबतीत मोठे पाऊल उचचले आहे.


खारघरच्या दोन प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या कोपरा पूल परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न आणि जीर्ण झालेल्या पुलावर उपाय म्हणून सिडको आणखी एक पुल बांधणार आहे. सिडकोने या पुलाचे बांधकाम हाती घेतले असून या कामाला सुरुवातदेखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा पुल थेट शीव-पनवेल सागरी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. सात मीटर रुंदीचा हा पूल असून या पुलामुळं खारघरमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


दरम्यान, कोपरा पुलावर कायमस्वरुपी मोठा पूल नियोजित आहे. मात्र, पालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमुळं यात अडथळा येत आहे. त्यामुळे या पुलाचे काम रखडले आहे. या मार्गावरील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी सिडकोने पुलाच्या स्वरुपाने तात्पुरता पर्याय काढला आहे. मुंबईकडे जाण्यासाठी कोपरा पुल हा एकमेव पर्याय असल्याने वाहनचालकांना नाइलाजास्तव विरुद्ध दिशेने वाहन चालवावी लागतात. मुंबईकडे जाण्यासाठी देखील पर्यायी मार्ग सिडकोने तयार करण्याची गरज आहे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Bandra : वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये तोडक कारवाईदरम्यान राडा; पोलिसांवर पेव्हर ब्लॉक भिरकावणारा गजाआड

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व येथील 'गरीब नगर' (Garib Nagar) परिसरात सुरू असलेल्या तोडक कारवाईदरम्यान एक अत्यंत

Mumbai Accident : वर्सोवा-जुहू लिंक रोडवर भीषण अपघात; भरधाव बसने अनेक गाड्यांना दिली धडक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा-जुहू लिंक रोडवर एका भरधाव बसने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाचे

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता 'मकोका' लागणार!

गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी; बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी संयुक्त भरारी पथके आणि सीमांवर