Pomegranate: चमकदार त्वचेसाठी करा डाळिंबाचा वापर

Share

मुंबई: डाळिंब हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. दररोज एक डाळिंब खाल्ल्याने बरेच फायदे होतात. मात्र फार कमी लोक हे जाणतात की डाळिंबाच्या वापराने तुम्ही तुमचा चेहराही चमकदार करू शकता.

डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेला सुंदर बनवण्यास मदत करतात. डाळिंबामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. सोबतच सुरकुत्या कमी होण्यासही मदत होते.

यातील अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुण डाग, पिपल्स कमी कऱण्यास मदत करतात. डाळिंबामध्ये व्हिटामिन सी असते जे त्वचेला पोषण देते. तसेच चमकदार बनवते. डाळिंबाचा वापर तुम्ही अनेक पद्धतीने करू शकता.

तुम्ही घरच्या घरीही डाळिंबाचा फेसपॅक बनवू शकता. यासाठी डाळिंबाचे दाणे वाटून पेस्ट बनवावी लागेल. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यानंतर २० मिनिटांनी चेहरा धुवा. तुम्ही दररोज डाळिंबाचा ज्यूसही पिऊ शकता.

याशिवाय डाळिंबाच्या बियांपासून निघालेले तेल त्वचेला मॉश्चराईज करण्यास मदत करते. तुम्ही रात्री झोपण्याआधी हे चेहऱ्यावर लावू शकता.

तुम्ही डाळिंबाचा रस मिसळून मास्कच्या रूपात लावा आणि २० मिनिटे सुकू द्या. त्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्या. दरम्यान डाळिंबाचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट जरू करा. काही लोकांना यामुळे अॅलर्जी होऊ शकते. जर हे लावल्यानंतर काही त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

8 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

8 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

9 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

10 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

10 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

10 hours ago