Weather updates : मुंबई, ठाणे, कोकणला उन्हाचा तडाखा! उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर

  223

तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता


मुंबई : गेल्या काही दिवसांत तापमानात प्रचंड वाढ (Heat) झाली आहे. घराबाहेर पडताच उन्हाच्या इतक्या झळा बसतात की अंगाची लाहीलाही होते. मुंबईसारख्या (Mumbai) ठिकाणी तापमान ४० अंशांपर्यंत जाऊन पोहोचत आहे. तर दुसरीकडे विदर्भ (Vidarbha), मराठवाड्याला (Marathwada) मात्र पावसाने झोडपून काढले आहे. या ठिकाणी वीज कोसळल्यामुळे माणसे, जनावरे दगावली आहेत, तर अनेक घरांचे व शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान कात्याने राज्यभरातील वातावरणाचे अंदाज वर्तवले आहेत.


राज्यात पुढील २४ तासासाठी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही भागात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. आज कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.



मुंबई, ठाणे, कोकणला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट


मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून उत्तर कोकणासाठीचा उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. तर आज ठाणे, मुंबई, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात संध्याकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.



नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन


पुढील २४ तासात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. उद्या देखील उत्तर कोकणासाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज कायम आहे. मंगळवारी मुंबईतील कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, उत्तर कोकणात कमाल तापमान ४० च्या पार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.



या भागात पावसाची शक्यता


पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उष्णतेची लाट तर काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत