Weather updates : मुंबई, ठाणे, कोकणला उन्हाचा तडाखा! उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर

Share

तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

मुंबई : गेल्या काही दिवसांत तापमानात प्रचंड वाढ (Heat) झाली आहे. घराबाहेर पडताच उन्हाच्या इतक्या झळा बसतात की अंगाची लाहीलाही होते. मुंबईसारख्या (Mumbai) ठिकाणी तापमान ४० अंशांपर्यंत जाऊन पोहोचत आहे. तर दुसरीकडे विदर्भ (Vidarbha), मराठवाड्याला (Marathwada) मात्र पावसाने झोडपून काढले आहे. या ठिकाणी वीज कोसळल्यामुळे माणसे, जनावरे दगावली आहेत, तर अनेक घरांचे व शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान कात्याने राज्यभरातील वातावरणाचे अंदाज वर्तवले आहेत.

राज्यात पुढील २४ तासासाठी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही भागात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. आज कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, कोकणला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून उत्तर कोकणासाठीचा उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. तर आज ठाणे, मुंबई, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात संध्याकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन

पुढील २४ तासात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. उद्या देखील उत्तर कोकणासाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज कायम आहे. मंगळवारी मुंबईतील कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, उत्तर कोकणात कमाल तापमान ४० च्या पार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या भागात पावसाची शक्यता

पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उष्णतेची लाट तर काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

6 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

6 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

7 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

8 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

8 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

8 hours ago