मुंबई: मुलांचा दिवस चांगला जावा यासाठी सकाळची सुरूवात आनंददायक झाली पाहिजे. आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम मुलांवर मोठ्या प्रमाणात होत असतो. जर सकाळी-सकाळी मुलांना चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी सांगितले तर त्यांचा संपूर्ण दिवस चांगला जातो. येथे अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकून मुले केवळ खुशच होणार नाही तर त्यांचा आत्मविश्वासही वाढेल.
सकाळी उठताच मुलांना प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणा आणि त्यांना मिठी मारा. तुमचे हास्य आणि तुमचा उत्साह त्यांना संपूर्ण दिवस खुश आणि सुरक्षित वाटेल. हे साधारण प्रेम त्यांना दिवसभरासाठी ताजेतवाने करेल.
सकाळच्या वेळेस घाईगडबड करू नका. काही वेळ आपल्या मुलांसोबत बसून गप्पा मारा. यामुळे त्यांना वाटेल की आपण त्यांना किती किंमत देतो. हा थोडासा वेळ त्यांच्यासाठी खास असू शकतो आणि तुमच्यातील नाते अधिक मजबूत होईल.
सकाळी मुलांना त्यांच्या स्वप्नाबद्दल विचारा आणि दाखवा की प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी किती खास आहे. ते खुलेपणाने यावेळी तुमच्याशी बोलतील. हे साधारण बोलणे तुमच्यावरील विश्वास आणि स्वत:ला सुरक्षित राहण्यास मदत करतील.
सकाळी उठताच आपल्या मुलाला सांगा की तुझा चेहरा पाहिल्यावर मला किती आनंद होतो ते. हे साधे वाक्य त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढवण्यास मदत करेल. त्यांना स्पेशल वाटेल.
सकाळी उठल्यावर आपल्या मुलाला विचारा की आज ते काय करणार आहेत. त्यांच्या योजनांमध्ये आवड दाखवा. यामुळे ते अधिक उत्साही होतील आणि दिवस आनंदाने सुरू होईल.
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…
मुंबई महानगरपालिकेचा आदेश मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे.…