Child : दररोज सकाळी मुलांना जरूर सांगा या ५ गोष्टी, होतील फायदे

  90

मुंबई: मुलांचा दिवस चांगला जावा यासाठी सकाळची सुरूवात आनंददायक झाली पाहिजे. आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम मुलांवर मोठ्या प्रमाणात होत असतो. जर सकाळी-सकाळी मुलांना चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी सांगितले तर त्यांचा संपूर्ण दिवस चांगला जातो. येथे अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकून मुले केवळ खुशच होणार नाही तर त्यांचा आत्मविश्वासही वाढेल.



सकाळी सकाळी प्रेमाने भेटा


सकाळी उठताच मुलांना प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणा आणि त्यांना मिठी मारा. तुमचे हास्य आणि तुमचा उत्साह त्यांना संपूर्ण दिवस खुश आणि सुरक्षित वाटेल. हे साधारण प्रेम त्यांना दिवसभरासाठी ताजेतवाने करेल.



थोडा वेळ एकत्र बसा


सकाळच्या वेळेस घाईगडबड करू नका. काही वेळ आपल्या मुलांसोबत बसून गप्पा मारा. यामुळे त्यांना वाटेल की आपण त्यांना किती किंमत देतो. हा थोडासा वेळ त्यांच्यासाठी खास असू शकतो आणि तुमच्यातील नाते अधिक मजबूत होईल.



स्वप्नांबाबत बोला


सकाळी मुलांना त्यांच्या स्वप्नाबद्दल विचारा आणि दाखवा की प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी किती खास आहे. ते खुलेपणाने यावेळी तुमच्याशी बोलतील. हे साधारण बोलणे तुमच्यावरील विश्वास आणि स्वत:ला सुरक्षित राहण्यास मदत करतील.



प्रेम दाखवा


सकाळी उठताच आपल्या मुलाला सांगा की तुझा चेहरा पाहिल्यावर मला किती आनंद होतो ते. हे साधे वाक्य त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढवण्यास मदत करेल. त्यांना स्पेशल वाटेल.



दिवसाची सुरूवात उत्साहाने करा


सकाळी उठल्यावर आपल्या मुलाला विचारा की आज ते काय करणार आहेत. त्यांच्या योजनांमध्ये आवड दाखवा. यामुळे ते अधिक उत्साही होतील आणि दिवस आनंदाने सुरू होईल.

Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या