Salman khan: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने मंगळवारी सांगितले की दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुज जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विक्की गुप्ता आणि सागर पाल आहे. विक्की आणि सुनीलने रविवारी सलमान खानच्या वांद्रेस्थित अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार केला होता.


सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याच्या आधी दोघेही मुंबईच्या जवळील पनवेल परिसरातील सोसायटीमध्ये गेल्या एका महिन्यापासून भाड्याच्या घरात राहत होते. या दोघांनी बॉलिवूड स्टारच्या घराची रेकी केली आणि गोळीबार केला. दोन्ही आरोपींना क्राईम ब्रांचने सोमवारी रात्री भुज येथून अटक केली. आरोपी बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात राहणारे आहेत. त्यांना पुढील कारवाईसाठी भुजवरून मुंबईत आणले जाईल.



सकाळी ५ वाजता केला होता गोळीबार


मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खानच्या वांद्रेस्थित गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या बाहेर बाईकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चार राऊंड गोळीबार केला होता. ही घटना रविवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. गोळीबारानंतर दोनही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार गोळीबाराची घटना घडली तेव्हा सलमान खान घरातच होता. दरम्यान, या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.



बाईक सोडून पळाले होते हल्लेखोर


तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गोळीबारानंतर हल्लेखोरांनी मोटारसायकल सलमानच्या घरापासून साधारण एक किमी अंतरावर सोडून दिली होती. त्यानंतर हल्लेखोर काही वेळ चालत गेले आणि वांद्रे स्टेशनसाठी त्यांनी एक ऑटोरिक्शा केली. तेथून आरोपी बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले मात्र सांताक्रुझ स्टेशनवर उतरले आणि तेथून बाहेर पडले. यानंतर ते मुंबईतून फरार होत गुजरातच्या भुज येथे जाऊन लपले.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील