Heat stroke : निंबाळकरांच्या सभेत आमदार कैलास पाटील कोसळले; उष्माघाताचा त्रास

धाराशीव : आज धाराशीवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र भर उन्हात नेत्यांच्या सभेदरम्यान आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांना उष्माघाताच्या त्रासामुळे (Heat stroke) चक्कर आली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापला असून ऐन उन्हाळ्यात उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना प्रचार करताना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.


लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात राजकीय नेत्यांना प्रचार करावा लागत आहे.


धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर हे आज उमेदवारी अर्ज भरणार होते. त्यामुळे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख उपस्थित होते. यावेळी सभा सुरू असतानाच कैलास पाटील यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर पडले. कैलास पाटील यांना उष्णाघाताचा त्रास झाल्यामुळे त्यांना चक्कर आली. यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. कैलास पाटील यांना रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

Comments
Add Comment

Kalyan: नागरिकांच्या घरांवर फेकले सुतळी बॉम्ब; कल्याणमधील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

मुंबई: कल्याण जवळील आंबिवली परिसरात नशेखोराकडून नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना नुकतीच घडली

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे

काळाराम मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण

नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ

नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड

कोल्हापूरचा धान्य महोत्सव; ‘मिलेट रॅली’ ला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या