Ram Navami 2024: राम नवमीच्या दिवशी फक्त ५-५ मिनिटांसाठी बंद असेल श्रीरामांचे मंदिर, १९ तास होणार दर्शन

  112

मुंबई: रामनवमीच्या दिवशी १७ एप्रिलला बुधवारी अयोध्येतील राम मंदिरात भक्तांना १९ तास दर्शनासाठी मिळणार आहेत. दिवसभरात केवळ ५-५ मिनिटांसाठी मंदिर बंद राहील. त्यानंतर पुन्हा प्रभू श्री रामांचे दर्शन होणार आहे. राम मंदिर ट्रस्टकडून ही माहिती देण्यात आली आह.


या दिवशी श्रीरामांची विधिवत पूजा आणि दर्शन सुरूच राहणार आहे. देवाला नैवेद्य अर्पण करतेवेळी काही काळ मंदिराचे कपाट बंद राहील. दरम्यान, रात्री ११ वाजेपर्यंत श्रीरामांचे दर्शन सुरू राहणार आहे.


१६, १७, १८ आणि १९ एप्रिलला सुगम दर्शन पास, व्हीआयपी दर्शन पास, मंगला आरती पास, श्रृंगार आरती पास बनणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे पास जारी केले जाणार नाहीत. इतर दिवशी सर्व सुविधा सुरू राहतील. दर्शनाची वेळ वाढवून १९ तास करण्यात आली आहे. मंगल आरतीपासून प्रारंभ होऊन रात्री ११ वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील.



८० ते १०० ठिकाणी एलईडी स्क्रीनवर होणार लाईव्ह


श्रीरामांच्या जन्मभूमीत संपन्न होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे लाईव्ह प्रसारण अयोध्या नगर निगम क्षेत्रातील साधारण ८० ते १०० ठिकाणी एलईडी स्क्रीनवरून दाखवले जाणार आहे.

Comments
Add Comment

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या

पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी

नवी दिल्ली : पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी लागू करण्यात आली आहे. भारत सरकारने निर्देश

जीएसटीच्या १२ टक्के स्लॅबमध्ये बदलाची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मुलाखतीत दिले संकेत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी स्लॅबमधील वस्तूंचा ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्याची तयारी

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत, या दरम्यान ते ब्रिक्स शिखर

नॅशनल हेरॉल्ड : ५० लाखात बळकावली २ हजार कोटींची मालमत्ता, राहुल आणि सोनिया गांधींसंदर्भात ईडीचा कोर्टात दावा

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधींनी ५० लाखात २ हजार कोटींची मालमत्ता

केंद्रीय कृषीमंत्री २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३ आणि ४ जुलै रोजी