मुंबई: रामनवमीच्या दिवशी १७ एप्रिलला बुधवारी अयोध्येतील राम मंदिरात भक्तांना १९ तास दर्शनासाठी मिळणार आहेत. दिवसभरात केवळ ५-५ मिनिटांसाठी मंदिर बंद राहील. त्यानंतर पुन्हा प्रभू श्री रामांचे दर्शन होणार आहे. राम मंदिर ट्रस्टकडून ही माहिती देण्यात आली आह.
या दिवशी श्रीरामांची विधिवत पूजा आणि दर्शन सुरूच राहणार आहे. देवाला नैवेद्य अर्पण करतेवेळी काही काळ मंदिराचे कपाट बंद राहील. दरम्यान, रात्री ११ वाजेपर्यंत श्रीरामांचे दर्शन सुरू राहणार आहे.
१६, १७, १८ आणि १९ एप्रिलला सुगम दर्शन पास, व्हीआयपी दर्शन पास, मंगला आरती पास, श्रृंगार आरती पास बनणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे पास जारी केले जाणार नाहीत. इतर दिवशी सर्व सुविधा सुरू राहतील. दर्शनाची वेळ वाढवून १९ तास करण्यात आली आहे. मंगल आरतीपासून प्रारंभ होऊन रात्री ११ वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील.
श्रीरामांच्या जन्मभूमीत संपन्न होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे लाईव्ह प्रसारण अयोध्या नगर निगम क्षेत्रातील साधारण ८० ते १०० ठिकाणी एलईडी स्क्रीनवरून दाखवले जाणार आहे.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…