मुंबई: चेन्नई आणि मुंबई यांच्यात रविवारी रंगलेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. चेन्नईने मुंबईला विजयासाठी २०७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला २० षटकांत केवळ ८ बाद १८६ धावाच करता आल्या. या पद्धतीने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने हा सामना २० धावांनी आपल्या नावावर केला.
दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. रोहितने ६३ बॉलमध्ये १०५ धावांची खेळी केली. यावेळी त्याने ११ चौकार आणि ५ षटकार ठोकले. मात्र त्याचे हे शतक मुंबईचा पराभव टाळू शकले नाही.
खरंतर, रोहित शर्माला इतर फलंदाजांची साजेशी साथ मिळू शकली नाही. रोहित शर्माने एक बाजू लावून धरली. मात्र दुसऱ्या बाजूने नियमित अंतराने फलंदाज बाद होत होते. तिलक वर्माने २० बॉलमध्ये ३१ धावांची खेळी केली. तर इशान किशनने १५ बॉलमध्ये २३ धावा केल्या. सूर्यकुमार यादव कोणतीही धाव न घेता बाद झाला. याशिवाय टीम डेविड आणि रोमरिया शेफर्ड या फलंदाजांनी निरााशा केली.
आता चेन्नई सुपर किंग्सचे ६ सामन्यातून ८ पॉईंट्स झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सचे ६ सामन्यांत ४ पॉईंटस झालेत ते आठव्या स्थानावर आहेत. या सामन्याआधी हार्दिकचा संघ सातव्या स्थानावर होता.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…