CSK vs MI: रोहितची शतकी खेळी व्यर्थ, चेन्नईने मुंबईला चारली पराभवाची धूळ

मुंबई: चेन्नई आणि मुंबई यांच्यात रविवारी रंगलेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. चेन्नईने मुंबईला विजयासाठी २०७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला २० षटकांत केवळ ८ बाद १८६ धावाच करता आल्या. या पद्धतीने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने हा सामना २० धावांनी आपल्या नावावर केला.


दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. रोहितने ६३ बॉलमध्ये १०५ धावांची खेळी केली. यावेळी त्याने ११ चौकार आणि ५ षटकार ठोकले. मात्र त्याचे हे शतक मुंबईचा पराभव टाळू शकले नाही.



रोहित शर्माचे शतक, मात्र बाकी फलंदाजांची निराशा


खरंतर, रोहित शर्माला इतर फलंदाजांची साजेशी साथ मिळू शकली नाही. रोहित शर्माने एक बाजू लावून धरली. मात्र दुसऱ्या बाजूने नियमित अंतराने फलंदाज बाद होत होते. तिलक वर्माने २० बॉलमध्ये ३१ धावांची खेळी केली. तर इशान किशनने १५ बॉलमध्ये २३ धावा केल्या. सूर्यकुमार यादव कोणतीही धाव न घेता बाद झाला. याशिवाय टीम डेविड आणि रोमरिया शेफर्ड या फलंदाजांनी निरााशा केली.


आता चेन्नई सुपर किंग्सचे ६ सामन्यातून ८ पॉईंट्स झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सचे ६ सामन्यांत ४ पॉईंटस झालेत ते आठव्या स्थानावर आहेत. या सामन्याआधी हार्दिकचा संघ सातव्या स्थानावर होता.

Comments
Add Comment

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे नाते चर्चेत: एकत्र फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-0 ने जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता