CSK vs MI: रोहितची शतकी खेळी व्यर्थ, चेन्नईने मुंबईला चारली पराभवाची धूळ

मुंबई: चेन्नई आणि मुंबई यांच्यात रविवारी रंगलेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. चेन्नईने मुंबईला विजयासाठी २०७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला २० षटकांत केवळ ८ बाद १८६ धावाच करता आल्या. या पद्धतीने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने हा सामना २० धावांनी आपल्या नावावर केला.


दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. रोहितने ६३ बॉलमध्ये १०५ धावांची खेळी केली. यावेळी त्याने ११ चौकार आणि ५ षटकार ठोकले. मात्र त्याचे हे शतक मुंबईचा पराभव टाळू शकले नाही.



रोहित शर्माचे शतक, मात्र बाकी फलंदाजांची निराशा


खरंतर, रोहित शर्माला इतर फलंदाजांची साजेशी साथ मिळू शकली नाही. रोहित शर्माने एक बाजू लावून धरली. मात्र दुसऱ्या बाजूने नियमित अंतराने फलंदाज बाद होत होते. तिलक वर्माने २० बॉलमध्ये ३१ धावांची खेळी केली. तर इशान किशनने १५ बॉलमध्ये २३ धावा केल्या. सूर्यकुमार यादव कोणतीही धाव न घेता बाद झाला. याशिवाय टीम डेविड आणि रोमरिया शेफर्ड या फलंदाजांनी निरााशा केली.


आता चेन्नई सुपर किंग्सचे ६ सामन्यातून ८ पॉईंट्स झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सचे ६ सामन्यांत ४ पॉईंटस झालेत ते आठव्या स्थानावर आहेत. या सामन्याआधी हार्दिकचा संघ सातव्या स्थानावर होता.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून