Salman Khan : सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार प्रकरणात बिश्नोई समाजाचा हात?

मुंबई गुन्हे शाखेचा दाट संशय; काय आहे प्रकरण?


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रेस्थित गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या (Galaxy apartment) बाहेर गोळीबार (Firing) करण्यात आला. हा हवेतील गोळीबार सकाळी साधारण ४.५० मिनिटांच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी केला. दोन्ही हल्लेखोर बाईकवरून आले होते आणि चार राऊंड फायरिंग केल्यानंतर ते तेथून पळून गेले. दरम्यान, या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सलमानच्या खानच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात बिश्नोई समाजाचा हा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.


सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या तपासासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. यापूर्वी सलमानच्या वडीलांना चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती, त्यानंतर धमकीचा ई-मेलही आला होता. आता रविवारी १४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराचा संबंधही बिश्नोई गँगशी असल्याचं बोललं जात आहे.


सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. याचं कारण म्हणजे बिश्नोई गँग (Lawrence Bishnoi) सलमानला धमकी देत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे गांभीर्य पाहून महाराष्ट्र एटीएसनेही याप्रकणी तपास सुरु केला आहे.



नेमकं प्रकरण काय?


१९९८ साली हम साथ साथ हैं चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता. सलमान खानने दोन वेळा चिंकारा हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जातं. हरणांची शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे. याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं.

Comments
Add Comment

Watermelon Death Case : कलिंगड खाल्लं अन् एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; दुकानदारानेच सांगितलं सत्य

मुंबई : बिर्याणी त्यानंतर थंडावा मिळावा म्हणून खाल्लेलं कलिंगड आणि थेट मृत्यू किती भयंकर आहे ना हे, मुंबईतील

Bacchu Kadu, Eknath Shinde : विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करेन - बच्चू कडू

मुंबई : "उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर

Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७