Mobile: रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता का? तर वेळीच व्हा सावध...

मुंबई: गरजेपेक्षा मोबाईल फोनचा अधिक वापर तुम्हाला मानसिकरित्या आजारी बनवू शकतो. आरोग्य तज्ञ म्हणूनच मोबाईलचा कमी वापर करण्याचा सल्ला देतात. जर तुम्हीही रात्री उशिरापर्यंत फोन वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. याच्यामुळ एक नव्हे तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात.


गरजेपेक्षा फोनचा अधिक वापर केल्याने तुम्हाला मानसिक आजार होऊ शकतात. आरोग्य तज्ञ यापासून वाचण्याचा सल्ला देतात. रात्री उशिरापर्यंत फोनचा वापर करणे डोळ्यांसाठी अतिशय नुकसानदायक असते. यामुळे डोळे खराबही होऊ शकतात. दिवसभर काम केल्यानंतरजर झोपण्याच्या वेळेस तुमचा संपूर्ण फोकस स्मार्टफोनवर असेल तर तुमच्या डोळ्यांना आराम मिळणार नाही. यामुळे डोळे कोरडे होऊ लागतात आणि डोळ्यांचे आरोग्य बिघडते.


रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याचा सगळ्यात मोठा नकारात्मक परिणाम म्हणजे झोपेत व्यत्यय. मोबाईल फोनमुळे झोप पूर्ण होत नाही आणि शरीरात मेलाटोनिन हार्मोन कमी होऊ लागते. यामुळे अनिद्रेचा त्रास होतो.


जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर करत आहात तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सतावू शकतो. मोबाईलमधून निघाणाऱ्या किरणांचा परिणाम डोळ्यांवर होतो.


रात्री उशिरापर्यंत मोबाईल सुरू ठेवणे मेंदूच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम मेंदूवर होतो. यामुळे चिडचिडेपणा वाढतो आणि विसरभोळ्याची समस्याही वाढते.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण