Mobile: रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता का? तर वेळीच व्हा सावध...

  62

मुंबई: गरजेपेक्षा मोबाईल फोनचा अधिक वापर तुम्हाला मानसिकरित्या आजारी बनवू शकतो. आरोग्य तज्ञ म्हणूनच मोबाईलचा कमी वापर करण्याचा सल्ला देतात. जर तुम्हीही रात्री उशिरापर्यंत फोन वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. याच्यामुळ एक नव्हे तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात.


गरजेपेक्षा फोनचा अधिक वापर केल्याने तुम्हाला मानसिक आजार होऊ शकतात. आरोग्य तज्ञ यापासून वाचण्याचा सल्ला देतात. रात्री उशिरापर्यंत फोनचा वापर करणे डोळ्यांसाठी अतिशय नुकसानदायक असते. यामुळे डोळे खराबही होऊ शकतात. दिवसभर काम केल्यानंतरजर झोपण्याच्या वेळेस तुमचा संपूर्ण फोकस स्मार्टफोनवर असेल तर तुमच्या डोळ्यांना आराम मिळणार नाही. यामुळे डोळे कोरडे होऊ लागतात आणि डोळ्यांचे आरोग्य बिघडते.


रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याचा सगळ्यात मोठा नकारात्मक परिणाम म्हणजे झोपेत व्यत्यय. मोबाईल फोनमुळे झोप पूर्ण होत नाही आणि शरीरात मेलाटोनिन हार्मोन कमी होऊ लागते. यामुळे अनिद्रेचा त्रास होतो.


जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर करत आहात तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सतावू शकतो. मोबाईलमधून निघाणाऱ्या किरणांचा परिणाम डोळ्यांवर होतो.


रात्री उशिरापर्यंत मोबाईल सुरू ठेवणे मेंदूच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम मेंदूवर होतो. यामुळे चिडचिडेपणा वाढतो आणि विसरभोळ्याची समस्याही वाढते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी