Missing case : गळ्यातील लॉकेटमध्ये क्यूआर कोड! हरवलेला दिव्यांग मुलगा सहा तासांतच परतला घरी

तंत्रज्ञानामुळे कुलाबा पोलिसांना मुलाच्या पालकांपर्यंत पोहोचण्यात मिळाले यश


नेमकं काय घडलं?


मुंबई : हल्लीच्या काळात तंत्रज्ञानाचा (Technology) वापर इतका वाढला आहे की त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वेळ आली आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि किती करावा हे आपल्याला कळलं पाहिजे. एका दिव्यांग (Intellectually Challenged) मुलाच्या पालकांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला आणि त्यांचा हरवलेला मुलगा (Missing child) अवघ्या सहा तासांत त्यांना परत मिळाला. मुंबईच्या वरळी भागात राहणारा हा दिव्यांग मुलगा खेळता खेळता बसमध्ये चढला आणि हरवला. मात्र त्याच्या गळ्यात असलेल्या लॉकेटमध्ये असलेल्या क्यूआर कोडमुळे (QR code) पोलिसांना काही वेळातच त्याच्या पालकांपर्यंत पोहोचता आलं.


ही घटना कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणाची माहिती देताना कुलाबा पोलीस ठाण्याने सांगितले की, विनायक कोळी असे या मुलाचे नाव आहे. वरळी परिसरातून खेळत असताना विनायक बसमध्ये बसला आणि बसमध्येच निघून गेला. तो हरवला असल्याचे समजताच कंडक्टरने पोलिसांशी संपर्क साधला. कंडक्टरने सांगितले की बसमध्ये एक मुलगा बसला आहे, जो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. तो फक्त त्याचे नाव सांगू शकतो. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाला पोलिस ठाण्यात घेऊन गेले.


यानंतर पोलिसांनी त्याच्या लॉकेटमध्ये क्यूआर कोड पाहिल्यानंतर त्यांनी तो स्कॅन केला. मुलाच्या गळ्यात असलेल्या लॉकेटचा क्यूआर कोड स्कॅन केला असता घरातील सदस्यांचा पत्ता आणि फोन नंबर सापडला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. तपशीलांची पुष्टी केल्यानंतर मुलाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. कुलाबा पोलिसांनी पुढे सांगितले की, हा मुलगा वरळी येथून दुपारी ३ वाजता बेपत्ता झाला होता. रात्री आठच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने त्याला पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले.



तंत्रज्ञानाने बजावली महत्त्वाची भूमिका


लॉकेटबद्दल डेटा इंजिनियर अक्षय रिडलान यांनी सांगितले की, आपल्या मुलाला अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतून वाचवण्यासाठी त्यांनी हे QR कोड लॉकेट मुलाच्या गळ्यात घातले होते. ज्यामध्ये मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी माहिती असलेली लिंक दिली आहे. या मुलाला पुन्हा कुटुंबाशी जोडण्यात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर