Narayan Rane : उद्वव ठाकरेंसारखा माणूस मुख्यमंत्री म्हणुन महाराष्ट्राला लागलेला कलंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हल्लाबोल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅट्रिक होणार


भाजपा महायुतीच्या चारशे खासदारांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार असणारच


मालवण : देशासाठी दिवस रात्र काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव जागतिक स्तरावर होत आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक अमेरिका व अन्य विकसित राष्ट्रानी केले आहे. विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाचा सन्मान सर्व स्तरावर होत असताना चारशेपेक्षा जास्त खासदार विजयी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅट्रिक पुर्ण होणार. यासोबत रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार भाजप महायुतीच्या चारशे खासदारांमधील एक असणार, असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केला.


दरम्यान, उद्धव ठाकरेंकडून (Uddav Thackeray) भाजपवर होत असलेल्या टीकेला कृतीतून उत्तर देणार. उद्धव ठाकरेंसारखा माणूस मुख्यमंत्री म्हणुन महाराष्ट्राला लागलेला कलंक होता, असा जोरदार हल्लाबोल नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या कंपनीत सगळेच चिटर असल्याचाही टोला त्यांनी यावेळी लगावला.


आडवली मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत राठीवडे येथे संपन्न झाला. यावेळी भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Sindhuratna Samruddhi Yojana 2.0 : 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०'ला मंजुरी

मंत्रिमंडळ बैठकीत तीन वर्षांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब; पालकमंत्र्यांकडे अध्यक्षपद, कोकणच्या सर्वांगीण

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू मुंबई : हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे

Nitesh Rane : कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; प्रकल्पबाधितांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या रेल्वे प्रशासनाला

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी