Rajnath Singh: काँग्रेस पक्ष डायनासोरप्रमाणे लुप्त होणार!

राजनाथ सिंह यांचा काँग्रेसवर घणाघात


डेहराडून : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचारादरम्यान एका सभेला संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी काँग्रेस (Congress) पक्षावर घणाघात केला. उत्तराखंड येथील गढवाल लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार अनिल बलूनी यांच्या समर्थनार्थ एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या काही वर्षांनंतर लहान मुलंसुद्धा काँग्रेस पक्षाला ओळखणार नाहीत असे म्हणत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे.


लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. अशातच मागील काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. पक्ष सोडून गेलेले नेते एनडीएमध्ये सहभागी होत आहेत. या नेत्यांमध्ये मिलिंद देवरा, अशोक चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. अशोक चव्हाण भाजपामध्ये दाखल झाले. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली. तर मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये सहभागी झाले आहेत.


काँग्रेसमधून नेते पळून जात आहेत. एकानंतर एक पक्ष सोडत आहेत. बाहेर पडलेले नेते भाजपा किंवा एनडीएमधील घटकपक्षांमध्ये सहभागी होत आहेत. मला भीती आहे की, पुढच्या काही वर्षांत काँग्रेस पक्ष डायनासोरप्रमाणे लुप्त होऊन जाईल. काँग्रेस नेते रोज एक-दुसऱ्याशी लढत आहेत. टीव्ही शो बिग बॉसप्रमाणे ते एकमेकांचे कपडे फाडत आहेत, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर सभेत म्हटले.


Comments
Add Comment

मांजरीच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांना भरावा लागला " इतका " दंड

नोएडा : नोएडामध्ये उपचारादरम्यान निष्काळजीपणामुळे मांजरीचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ग्राहक विवाद

'टायटॅनिक पोज' आणि 'उभं राहून बाईक' चालवणं पडलं महागात! मानसी पारेख आणि टिकू तल्सानियावर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल

अहमदाबाद : अभिनेत्री मानसी पारेख (Manasi Parekh) आणि ज्येष्ठ अभिनेते टिकू तल्सानिया (Tiku Talsania) यांच्यावर अहमदाबादच्या

Mamta kulkarni : वाद वाढताच ममता कुलकर्णीचा 'यू-टर्न'; 'दाऊद दहशतवादी नाही' म्हणणारी अभिनेत्री आता म्हणाली...

'मी दाऊदबद्दल नाही, तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते...  अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून