Mc Mary Kom : मेरी कोमने दिला पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अभियान प्रमुख पदाचा राजीनामा

अचानक हा निर्णय घेण्याचं काय आहे कारण?


नवी दिल्ली : तब्बल सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन (World champion) राहिलेली भारताची बॉक्सर एमसी मेरी कॉमने (Boxer MC Mary Kom) आज पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अभियानाचे प्रमुख पद (Paris Olympics Chef De Mission) सोडल्याची बातमी समोर आली आहे. मेरी कॉमने भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा पीटी उषा (PT Usha) यांना पत्र लिहून आपण वैयक्तिक कारणामुळे हे पद सोडत असल्याचे सांगितले.


मेरी कॉमने पत्रात लिहिले की, 'देशाची कोणत्याही स्वरूपात सेवा करणे ही अभिमानाची बाब असते. मी हे पद स्विकारण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होते. मात्र मला खेदपूर्वक सांगावं लागतंय की मी ही जबाबदारी घेऊ शकत नाही. मी वैयक्तिक कारणामुळे हे पद सोडत आहे. या प्रकारे मी या जबाबदारीपासून मागे हटत आहे याची शरम वाटते. मी कधी असे करत नाही. मात्र आता माझ्याकडे कोणताच पर्याय नाही. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम मी कायम करेन.'


आयओएने २१ मार्चला मेरी कॉमची या पदावर नियुक्ती केली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कॉमने कांस्य पदक जिंकले होते. २६ जुलै ते ११ ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिक खेळात भारतीय संघाची ती अभियान प्रमुख होती.


याबाबत पीटी उषा यांनी सांगितले की, 'ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर आणि आयओए अॅथलिट आयोगाची प्रमुख मेरी कॉमला वैयक्तिक कारणामुळे या पदावरून हटावे लागत आहे याचा आम्हाला खेद आहे. आम्ही तिच्या या निर्णयाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करतो. मेरी कॉमच्या पर्यायाबद्दल लवकरच घोषणा केली जाईल. मी मेरी कॉमला सांगितले आहे की आयओए आणि माझा तिला कायम पाठिंबा राहणार आहे. मी सर्वांना तिच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करण्याची विनंती करते'.

Comments
Add Comment

किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या

प्रसिद्ध अभिनेत्रीला अश्लील फोटो, Video पाठवून मानसिक त्रास, आरोपीला अटक, काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : प्रख्यात टीव्ही अभिनेत्रीला फेसबुकवर वारंवार अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याबद्दल ऑनलाइन छळाची

८वा वेतन आयोग मंजूर पण सरकारी कर्मचारी धास्तावले; कारण काय?

केंद्राचा मोठा निर्णय: पगारवाढीऐवजी आता 'कामकाजावर' वेतन! नवी दिल्ली : देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि

Rahul Gandhi : "मतदान वेळी आक्षेप घेतला नाही आणि आता २५ लाख बोगस मतदारांचा आरोप!" राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचं थेट आव्हान!

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) हरियाणा विधानसभा निवडणुकीतही (Haryana Assembly

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मारवाडी मानसिकता थांबवू शकते’

आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्चचे संचालक डॉ. तंवर यांचे भाष्य जोधपूर : ऐतिहासिकदृष्ट्या राजस्थान आणि

‘वंदे भारत’साठी जोधपूरमध्ये पहिला देखभाल डेपो

मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी जोधपूर  : जलद गतीने धावणारी वंदे भारत