मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये(indian premier league 2024) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने विजयाचा वेग हाती घेतला आहे. त्यांनी गुरूवारी आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला.
मुंबईच्या विजयाचे हिरो वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्टार फलंदाज इशान किशन ठरले. याआधी बुमराहने ५ विकेट घेत आरसीबीला उद्ध्वस्त केले. त्यानंतर इशान आणि सूर्याने जबरदस्त अर्धशतक ठोकत मुंबईला विजय मिळवून दिला.
या हंगामातील मुंबईच्या ५ सामन्यांतील त्यांचा हा दुसरा विजय आहे. या संघाने हंगामातील सुरूवातीच तीन सामने हरले होते. मात्र आता सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीच्या संघाचा ६ सामन्यांतील हा ५ वा पराभव आहे.
सामन्यात मुंबईला विजयासाठी १९७ धावांचे आव्हान मिळाले होते. याच्या प्रत्युत्तरादाखल या संघाने ३ विकेट गमावत १५.३ षटकांत सामना आपल्या नावे केला. मुंबईसाठी सलामीवीर इशान किशनने ३४ बॉलमध्ये ६९ धावांची खेळी केली. यानंतर सूर्यकुमार यादवने १७ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. तो १९ बॉलमध्ये ५२ धावा करत बाद झाला.
तर रोहित शर्माने २४ बॉलमध्ये ३८ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्या ६ बॉलमध्ये २१ धावा केल्या आणि षटकार ठोकत विजय मिळवून दिला. आरसीबीसाठी कोणताही गोलंदाज कमाल करू शकला नाही. सगळ्यांनी मुंबईसमोर गुडघे टेकले.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…