मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये(indian premier league 2024) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने विजयाचा वेग हाती घेतला आहे. त्यांनी गुरूवारी आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला.
मुंबईच्या विजयाचे हिरो वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्टार फलंदाज इशान किशन ठरले. याआधी बुमराहने ५ विकेट घेत आरसीबीला उद्ध्वस्त केले. त्यानंतर इशान आणि सूर्याने जबरदस्त अर्धशतक ठोकत मुंबईला विजय मिळवून दिला.
या हंगामातील मुंबईच्या ५ सामन्यांतील त्यांचा हा दुसरा विजय आहे. या संघाने हंगामातील सुरूवातीच तीन सामने हरले होते. मात्र आता सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीच्या संघाचा ६ सामन्यांतील हा ५ वा पराभव आहे.
सामन्यात मुंबईला विजयासाठी १९७ धावांचे आव्हान मिळाले होते. याच्या प्रत्युत्तरादाखल या संघाने ३ विकेट गमावत १५.३ षटकांत सामना आपल्या नावे केला. मुंबईसाठी सलामीवीर इशान किशनने ३४ बॉलमध्ये ६९ धावांची खेळी केली. यानंतर सूर्यकुमार यादवने १७ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. तो १९ बॉलमध्ये ५२ धावा करत बाद झाला.
तर रोहित शर्माने २४ बॉलमध्ये ३८ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्या ६ बॉलमध्ये २१ धावा केल्या आणि षटकार ठोकत विजय मिळवून दिला. आरसीबीसाठी कोणताही गोलंदाज कमाल करू शकला नाही. सगळ्यांनी मुंबईसमोर गुडघे टेकले.
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…
गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…
बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…
तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक…
आता 'हे' असणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) काल म्हणजेच ४ जुलै रोजी…
एक दिव्यांगासह ३०० सायकल वारकऱ्यांचा सहभाग नाशिक : विठू नामाचा गजर करत दरवर्षी हजारो वारकरी…