Fruits: तुम्ही जेवल्यानंतर फळ खाता का?

  158

मुंबई: अनेकांना याबाबतीत शंका असते की फळ खाण्याची योग्य वेळ काय आहे? फळे कधी खाल्ली पाहिजेत जेवणाआधी की जेवणानंतर? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आज जाणून घेऊया की जेवणानंतर फळे खाल्ली पाहिजेत की नाही...


फळे आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर असतात. यात मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि व्हिटामिनसोबत कॅलरीजही असतात. मात्र अनेकजण कन्फ्युज असतात की फळे खाण्याची योग्य वेळ काय आहे...


आरोग्य तज्ञांच्या मते फळे जेवणाच्या अर्धा ते एक तास आधी खाल्ली पाहिजेत. यामुळे शरीरास पोषण मिळते. जर तुम्ही फळे जेवणानंतर खात असाल तर शरीरात फळांमधील एक्स्ट्रा कॅलरीज जातात. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचते.


त्यामुळे फळे जेवणासोबत अथवा जेवणानंतर लगेचच खाऊ नये. फळे खाण्याची योग्य वेळे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असते. रात्री झोपण्याआधी फळांचे सेवन करू नये.


आरोग्य तज्ञ सांगतात की जेवणानंतर लगेचच फळे अजिबात खाऊ नयेत. खरंतर, जेवणाआधी शरीराला कॅलरीजची गरज असते जी जेवणादरम्यान पूर्ण होते. त्यामुळे त्यानंतर फळे खाल्ल्यास शरीरास अधिकची कॅलरी घ्यावी लागते. यामुळे पाचनशक्तीवर परिणाम होतो. यामुळे पोटाशी संबंधित आजार अपचन, अॅसिडिटीचा त्रास होतो.

Comments
Add Comment

Health: दररोज सकाळी खा एक वाटी पपई, महिनाभरात शरीरात दिसतील हे बदल

मुंबई: पपई केवळ एक स्वादिष्ट फळच नाही तर तुमच्या आरोग्यासाठी वरदान आहे. हे शरीरास अनेक प्रकारचे फायदे देते.

औषध नको; या भाज्या खा आणि साखरेवर मात करा!

आधुनिक जीवनशैली, ताणतणाव आणि अन्नातील असंतुलनामुळे मधुमेह व हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या