Fruits: तुम्ही जेवल्यानंतर फळ खाता का?

मुंबई: अनेकांना याबाबतीत शंका असते की फळ खाण्याची योग्य वेळ काय आहे? फळे कधी खाल्ली पाहिजेत जेवणाआधी की जेवणानंतर? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आज जाणून घेऊया की जेवणानंतर फळे खाल्ली पाहिजेत की नाही...


फळे आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर असतात. यात मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि व्हिटामिनसोबत कॅलरीजही असतात. मात्र अनेकजण कन्फ्युज असतात की फळे खाण्याची योग्य वेळ काय आहे...


आरोग्य तज्ञांच्या मते फळे जेवणाच्या अर्धा ते एक तास आधी खाल्ली पाहिजेत. यामुळे शरीरास पोषण मिळते. जर तुम्ही फळे जेवणानंतर खात असाल तर शरीरात फळांमधील एक्स्ट्रा कॅलरीज जातात. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचते.


त्यामुळे फळे जेवणासोबत अथवा जेवणानंतर लगेचच खाऊ नये. फळे खाण्याची योग्य वेळे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असते. रात्री झोपण्याआधी फळांचे सेवन करू नये.


आरोग्य तज्ञ सांगतात की जेवणानंतर लगेचच फळे अजिबात खाऊ नयेत. खरंतर, जेवणाआधी शरीराला कॅलरीजची गरज असते जी जेवणादरम्यान पूर्ण होते. त्यामुळे त्यानंतर फळे खाल्ल्यास शरीरास अधिकची कॅलरी घ्यावी लागते. यामुळे पाचनशक्तीवर परिणाम होतो. यामुळे पोटाशी संबंधित आजार अपचन, अॅसिडिटीचा त्रास होतो.

Comments
Add Comment

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाचा प्रभावी उपयोग: ही ५ योगासने ठरतील लाभदायक

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहार आणि तणावमय दिनचर्येमुळे अनेक गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष