Fruits: तुम्ही जेवल्यानंतर फळ खाता का?

  174

मुंबई: अनेकांना याबाबतीत शंका असते की फळ खाण्याची योग्य वेळ काय आहे? फळे कधी खाल्ली पाहिजेत जेवणाआधी की जेवणानंतर? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आज जाणून घेऊया की जेवणानंतर फळे खाल्ली पाहिजेत की नाही...


फळे आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर असतात. यात मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि व्हिटामिनसोबत कॅलरीजही असतात. मात्र अनेकजण कन्फ्युज असतात की फळे खाण्याची योग्य वेळ काय आहे...


आरोग्य तज्ञांच्या मते फळे जेवणाच्या अर्धा ते एक तास आधी खाल्ली पाहिजेत. यामुळे शरीरास पोषण मिळते. जर तुम्ही फळे जेवणानंतर खात असाल तर शरीरात फळांमधील एक्स्ट्रा कॅलरीज जातात. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचते.


त्यामुळे फळे जेवणासोबत अथवा जेवणानंतर लगेचच खाऊ नये. फळे खाण्याची योग्य वेळे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असते. रात्री झोपण्याआधी फळांचे सेवन करू नये.


आरोग्य तज्ञ सांगतात की जेवणानंतर लगेचच फळे अजिबात खाऊ नयेत. खरंतर, जेवणाआधी शरीराला कॅलरीजची गरज असते जी जेवणादरम्यान पूर्ण होते. त्यामुळे त्यानंतर फळे खाल्ल्यास शरीरास अधिकची कॅलरी घ्यावी लागते. यामुळे पाचनशक्तीवर परिणाम होतो. यामुळे पोटाशी संबंधित आजार अपचन, अॅसिडिटीचा त्रास होतो.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी