मुंबईत रवींद्र वायकर, उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीची शक्यता

मुंबई : काही दिवसांपूर्वी उबाठाचे अतिशय जवळचे सहकारी मानले जाणारे नेते रवींद्र वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उत्तर पश्चिम लोकसभेची जागा महाविकास आघाडीत उबाठा गटाला सुटली आहे. तिथे उबाठाचे उमेदवार अमोल कीर्तिकर निवडणूक लढवत आहेत.त्यांच्याविरोधात आता रवींद्र वायकर हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेटीमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.


तसेच उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे. पूनम महाजनांचा पत्ता कट करुन उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध सरकारी वकील आहेत. त्यांनी २६/११ हल्ल्याची केस लढवली होती.


त्यांनी कोर्टात युक्तिवाद केल्यामुळे दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा झाली. त्यामुळे उज्ज्वल निकम यांच्या रुपाने मोठा चेहरा भाजपकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या मतदारसंघातील सध्याच्या खासदार पूनम महाजन या दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत.

Comments
Add Comment

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलैत तीन दिवसांच्या महाराजस्व मोहिमेचे आयोजन

२१ ते २३ जुलैदरम्यान ५० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत