अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Share

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना काही दिवसांपूर्वी ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांना अटक केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले. तसेच सक्तवसुली संचालनालयाकडून केजरीवाल यांना अटक केल्याप्रकरणी आक्षेप घेणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता केजरीवाल यांना पुढील सुनावणीसाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर न्यायालयाने कोठडी सुनावली. या कोठडी विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र त्यावेळी न्यायालयाने पुरेश्या पुराव्यांच्या आधारे केजरीवाल यांना अटक केल्याचे सांगितले आणि त्यांची याचिका फेटाळून लावली.

त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी विशेष खंडपीठ स्थापले जाणार नाही. तसेच या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याचा युक्तीवाद ॲड. अभिषेक मनू सिंघवी यांनी केल्यानंतर तुम्ही याचिकेच्या संदर्भात ई–मेल केला आहे का? अशी विचारणा सरन्यायाधीशांनी केली.

दरम्यान, त्यांच्या विरोधात ३५ ते ४० खटले सुरु आहेत. खटल्यांच्या अनुषंगाने वकिलांशी चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ हवा आहे, असे अरविंद केजरीवाल यांचे वकील विकी जैन यांनी सांगितले आहे. त्यामुळे आठवड्यातून दोनदा वकिलांना भेटता येण्याची परवानगी द्यावी, ही याचिका अरविंद केजरीवाल यांनी राउज अव्हेन्यू न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार, कोर्टाने त्यांच्या वकिलाला आठवड्यातून दोनदा भेटता यावे अशी परवानगी देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगामध्ये जाऊन भेटण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संजय सिंह यांनी केली होती. मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे.

एखादी व्यक्ती तुरुंगातून सरकार चालविण्याचा पर्याय निवडत असेल तर त्याला अपवाद मानले जाऊ शकत नाही. अशा व्यक्तीला विशेषाधिकार दिले जाऊ शकत नाहीत, असे ईडीकडून सांगण्यात आले आहे. बैठकांचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी केला जाऊ शकतो, असे देखील सांगण्यात आले आहे.

Recent Posts

Bombay High Court : भरघोस पगारासह मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी!

जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…

3 hours ago

Eknath Shinde : संयम राखावाच लागेल, कारण तुम्हाला यापुढेही विरोधातच बसायचे आहे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…

3 hours ago

Hathras stampede : हाथरसमध्ये सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी! २७ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये धार्मिक सत्संगादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. भोले…

4 hours ago

Google Aai : तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवायला येतेय ‘गुगल आई’!

उत्सुकता वाढवणारा टीझर रिलीज; 'या' तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट मुंबई : सध्याच्या काळात इंटरनेटचा (Internet)…

4 hours ago

Nitesh Rane : पुन्हा असं केलं तर हिंदू समाजही तिसरा डोळा उघडेल!

आमदार नितेश राणे यांचा राहुल गांधींना कडक इशारा शिवसेनेच्या जडणघडणीतला खरा व्हिलन उद्धव ठाकरे :…

4 hours ago

Ghatkopar hoarding accident case : होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचे धागेदोरे मातोश्रीपर्यंत पोहोचले? भाजप आमदारांची चौकशीची मागणी

मुंबई : घाटकोपर येथे १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग…

5 hours ago