मुंबई: आयपीएल २०२४च्या हंगामातील एक तृतीयांश सामने पार पडले आहे. या हंगामात आतापर्यंत २३ सामने खेळवले गेले आहेत. २४वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या २३ सामन्यानंतर जर प्लेऑफचे चित्र पाहण्याचा प्रयत्न केला तर राजस्थान रॉयल्सचा संघ चांगल्या स्थितीत आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांची स्थिती अतिशय खराब आहे.
यातच आकाश चोप्रा यांचे एक ट्वीट व्हायरल होत आहे यात आयपीएल २०२४च्या मध्येत कर्णधार बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आकाश चोप्रा यांचे हे ट्वीट १३ फेब्रुवारीचे आहे. यात त्यांनी लिहिले होते की, मला असे का वाटते की आयपीएलच्या या हंगामाच्या मध्येच एक संघ कर्णधार बदलेल? होईल का? वाट पाहूया. आकाश चोप्रा यांनी आपले हे ट्वीट एप्रिलमध्ये रिट्वीट केले. याबाबत लिहिले, आपण प्रत्येक सामन्यागणिक या बदलाच्या जवळ येत आहोत का?
आकाश चोप्राने पोस्टवर फॅन्सला अनेक उत्तरे दिली आहेत. अधिकतर चाहत्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याच कारणामुळे दोन्ही संघाची स्पर्धेतील आतापर्यंतची खराब कामगिरी झाली आहे.
काही युजर्सनी लिहिले की आरसीबी फाफ डू प्लेसिसला हटवून विराट कोहलीला पुन्हा कर्णधार बनवू शकते. तर रोहित शर्माच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पुनरागमन होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२४मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. या संघाने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांपैकी एक सामना जिंकला आहे. बाकी तीन सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला. मुंबई इंडियन्स आयपीएल २०२४च्या पॉईंट टेबलमध्ये ८व्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एका विजयासह पॉईंट टेबलमध्ये ९व्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…