रायगड जिल्ह्यात उन्हाळी भातक्षेत्राला लागली घरघर

गुरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न ऐरणीवर; शेतकऱ्यांची वाढली चिंता


माणगाव : रायगड जिल्हा हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. मात्र, डोळवहाळ बंदाऱ्यातील कालवा ठिकठिकाणी नादुरुस्त झाला आहे. शासनाकडून या कालव्याची साफसफाई करण्यासाठी पुरेशी यंत्र सामग्री मिळत नसल्याने माणगाव तालुक्यातील शेवटच्या शेतीपर्यत पाणी पोहचत नसल्याने उन्हाळी रब्बी हंगामातील पिकाचे क्षेत्र कमी होऊन भात पीक धोक्यात येत आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यातील भात पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.


रब्बी हंगामातील भाताचे पीक हे शाश्वत पीक म्हणून शेतकरी या मुख्य पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळतो. मात्र, यंदाच्या वर्षी काळ प्रकल्पाच्या कालव्याला मुदतीत पाणी न सोडल्याने माणगाव तालुक्याला भाताचे कोठार म्हणून असलेली ओळख यंदाच्या वर्षी पुसट होत आहे. दिवसेंदिवस भाताचे रब्बी हंगामातील भात पिकाचे क्षेत्र घटत आहे. रायगड जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे. यंदाचे वर्षी १२० हेक्टरवर भात लागवड केली आहे. तालुक्यातील उन्हाळी हंगामातील हजारो हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकाचे उत्पादनात कमालीची घट झाली असून यंदा भात पिकाच्या उत्पादनावर चांगलीच संक्रांत कोपली आहे. तर यंदाचे वर्षी १३५० हेक्टरवर कडधान्ये शेतकऱ्यांनी लावले होते.


तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदाचे वर्षी १२० हेक्टर म्हणजेच ३०० एकरवर भात पिक लावणी होणार आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात भात पिक घेतले जात होते. दिवसेंदिवस या क्षेत्रात घट होत असून सध्या स्थितीत कालवा पाण्यामुळे १ हजार हेक्टर क्षेत्र पडून आहे. गेल्या वर्षी सन २०२२-२३ मध्ये हेक्टरी उत्पादन ४० क्विंटल प्रमाणे ४४ हजार ४०० क्विंटल सरासरी उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले होते. गेल्यावर्षी सन २०२२-२३ मध्ये ९८ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाच्या उत्पादनात घट होवून ३८ क्विंटल उत्पादन मिळू शकले. म्हणजेच २९४० क्विंटल उत्पादन शेतकर्यांना मिळणे अपेक्षित होते.


पर्यायाने तालुक्याच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होत असून याचा फटका जिल्ह्याच्या बाजारपेठेलाही बसणार आहे. भात या मुख्य पिकाबरोबरच शेतकर्यांनी कडधान्याचे पिकही मोठ्या प्रमाणात घेतले आहे.



माणगावची भाताची ओळख होतेय पुसट


उन्हाळी भात पीक हे शाश्वत पीक म्हणून शेतकरी पाहतो. त्याचबरोबर गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्यवसायाला पूरक नगदी पीक म्हणून कलिंगड मोठ्या प्रमाणात पिकवले आहे. भाताची ओळख माणगावची पुसट होत असली तरी कडधान्य आणि कलिंगडाच्या विक्रमी उत्पादनातून ती ओळख गडद होत आहे. रब्बी भाताचे क्षेत्र वाढवण्यासाठी शासनांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.


Comments
Add Comment

खासदार नारायण राणे यांना वाढदिवशी मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा

कणकवली : नारायण राणे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेली भाषणे ऐकण्याची बघण्याची संधी मला प्राप्त

Nashik : नाशिक आणि जळगावच्या शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा हात

नाशिक : अवकाळी पावसाच्या तडाख्याने उध्वस्त झालेल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना पोलिसांची नोटीस

- कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास तीव्र  भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून रुपाली चाकणकर

Crop registration : आता प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक

डिजिटल क्रॉप सर्वेक्षण होणार; तलाठी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या जबाबदाऱ्या

'Operation Tiger' : खासदार फुटी’च्या अफवांचे सूत्रधार उबाठाचेच नेते!

अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’चे थोतांड; खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका मुंबई :

Pune FDA Action : पुण्यात एफडीएची कारवाई; मावळमध्ये भेसळयुक्त आंबा पल्प जप्त

पुणे : उन्हाळ्यात नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत