Health: आले-तुळसने बनलेले हे ड्रिंक करणार वेटलॉस, काही महिन्यात पोट होईल कमी

मुंबई: खराब लाईफस्टाईलमुळे हल्ली लठ्ठपणाची(obesity) समस्या सामान्य बनत चालली आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. आम्ही तुम्हाला तुळस, मध आणि आल्यापासून बनणाऱ्या अशा ड्रिंकबद्दल सांगत आहोत ज्यामुळे वेटलॉस होण्यास मदत होईल.


तुळशीमध्ये युजेनॉल नावाचे आवश्यक तेल असते जे पचनसंस्थेसाठी अतिशय फायदेशीर असते. यासोबतच हाडांचे दुखणेही कमी होते.


तर आल्यामध्ये जिंजरोल नावाचे तत्व असते. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच शरीरातून एक्स्ट्रा फॅट बाहेर निघण्यास मदत होते.


आले आणि तुळस यांनी बनलेले हे स्पेशल ड्रिंक बनवण्यासाठी पाच ते सहा ताजी तुळशीची पाने आणि आल्याचा एक तुकडा घ्या.


एका भांड्यात पाणी घ्या. त्यात तुळस आणि आले टाका आणि पाणी अर्धे होत नाही तोपर्यंत उकळा.


उकळल्यानंतर पाणी गाळून घ्या आणि एका ग्लासात घ्या. स्वादासाठी तुम्ही यात मध मिसळू शकता. हळू हळू हे मिश्रण प्या.


हे मिश्रण सकाळी प्यायल्यास अधिक फायदेशीर आहे. दररोज याचे सेवन केल्यास महिन्याभरात याचे परिणाम दिसण्यास सुरूवात होईल.

Comments
Add Comment

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल