Cancer: तरूणांमध्ये वेगाने वाढतोय कॅन्सर, दरवर्षी १५ लाखाहून अधिक रुग्ण

मुंबई: डायबिटीजमंतर भारतात कॅन्सर वेगाने वाढत आहे. या जीवघेण्या आजाराला दरवर्षी मोठ्या संख्येने लोक बळी पडत आहेत. एका नव्या अभ्यासादरम्यान आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे.


एका रिपोर्टनुसार देशात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, याचे बळी देशातील तरूण लोक पडत आहेत.



ही आकडेवारी भयानक


कमी वयाच्या लोकांमध्ये कॅन्सरचा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हे खरंच चिंताजनक आहे. आकड्यांवर नजर टाकली असता २०२०मध्ये देशात १३.९ लाख कॅन्सरचे रुग्ण होते. यांची संख्या २०२५ पर्यंत १५.७ टक्क्यांवर पोहोचण्यची शक्यता आहे.



कमी वयात कॅन्सरचा धोका अधिक


भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर अधिक वेगाने वाढत आहे. यात कमी वयाच्या लोकांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अमेरिका आणि ब्रिटनव्यतिरिक्त इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी वयाच्या लोकांना वेगाने कॅन्सर होत आहे. याचे कारण बाकी देशांच्या तुलनेत या आजारांचे स्क्रीनिंग फार कमी असणे तसेच उशिराने होणे हे आहे.



भारतात कोणत्या प्रकारच्या कॅन्सरच्या केसेस अधिक


रिपोर्टनुसार महिलांमध्ये सर्व्हिक्स कॅन्सर अथवा सर्व्हायकल कॅन्सर तसेच ओव्हरीज कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे.


पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका अधिक आहे.


कोलन कॅन्सर अथवा आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण तरुणांमध्ये अधिक आढळते. या कॅन्सरचे ३० टक्के रूग्ण हे ५० वर्षाच्या आतील आहे.

Comments
Add Comment

Plane Crash News : हवेतच विमानाचे नियंत्रण सुटले अन् दोन्ही वैमानिकांचा...प्रयागराजमध्ये भीषण अपघात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज दुपारी भारतीय वायू सेनेच्या एका प्रशिक्षणार्थी विमानाला

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना