बाळंगगा धरणग्रस्तांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

पेण : राज्यासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक आयोगाकडून शंभर टक्के मतदानासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. पेण तालुक्यात बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.


बाळगंगा धरणाचे काम २०१० पासून सुरू झाले असून जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाला १३ वर्षे पूर्ण होत आली तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जावळी, वरसई, करोटी, निधवली, गागोदे आणि वाशिवली या सहा ग्रामपंचायतीतील ९ महसुली गावे आणि १३ आदिवासी वाड्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले असून प्रकल्पामुळे तीन हजारांहून अधिक कुटुंबे विस्थापित झाले.


हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी प्रकल्पग्रस्तांनी अनेकदा आंदोलने केली, मात्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्रासह राज्यातील सत्ताधाऱ्यांनी बाळगंगा प्रकल्पग्रस्तांकडे दुर्लक्ष केले आहे. १३ वर्षांपासून बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोकप्रतिनिधींनीकडूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे यंदा मतदान न करता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार निर्धार केला आहे.


Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा