Accident: ५० फूट खोल दरीत कोसळली बस, १२ जणांचा दुर्देवी मृत्यू

दुर्ग(छत्तीसगड): छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात मंगळवारी एक बस खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की कुम्हारी ठाणे क्षेत्रांतर्गत खपरी गावाच्या करीब मुरम या ५० फूट खोल दरीत बस कोसळल्याने झालेल्या अपघातात १२ जण मृत्यूमुखी पावले. तर इतर ३८ लोक जखमी झाले.


केडिया डिस्टिलरीजची बस कर्मचाऱ्यांना घेऊन निघाली होती. बसमध्ये ४५ कर्मचारी होती. ही घटना मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. बसवरील नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी रवाना झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मृतदेह तसेच जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच दरीत कोसळलेली बस काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.


 


मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक


छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या अपघाताप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, दुर्गच्या कुम्हारीजवळ खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भरलेल्या बसला अपघात झाल्याची दुख:द माहिती मिळाली. मी ईश्वराकडे या अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांना हे दुख: सहन करण्याची ताकद मिळो अशी प्रार्थना करतो.

Comments
Add Comment

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा