Accident: ५० फूट खोल दरीत कोसळली बस, १२ जणांचा दुर्देवी मृत्यू

  65

दुर्ग(छत्तीसगड): छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात मंगळवारी एक बस खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की कुम्हारी ठाणे क्षेत्रांतर्गत खपरी गावाच्या करीब मुरम या ५० फूट खोल दरीत बस कोसळल्याने झालेल्या अपघातात १२ जण मृत्यूमुखी पावले. तर इतर ३८ लोक जखमी झाले.


केडिया डिस्टिलरीजची बस कर्मचाऱ्यांना घेऊन निघाली होती. बसमध्ये ४५ कर्मचारी होती. ही घटना मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. बसवरील नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी रवाना झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मृतदेह तसेच जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच दरीत कोसळलेली बस काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.


 


मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक


छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या अपघाताप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, दुर्गच्या कुम्हारीजवळ खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भरलेल्या बसला अपघात झाल्याची दुख:द माहिती मिळाली. मी ईश्वराकडे या अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांना हे दुख: सहन करण्याची ताकद मिळो अशी प्रार्थना करतो.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे