Accident: ५० फूट खोल दरीत कोसळली बस, १२ जणांचा दुर्देवी मृत्यू

दुर्ग(छत्तीसगड): छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात मंगळवारी एक बस खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की कुम्हारी ठाणे क्षेत्रांतर्गत खपरी गावाच्या करीब मुरम या ५० फूट खोल दरीत बस कोसळल्याने झालेल्या अपघातात १२ जण मृत्यूमुखी पावले. तर इतर ३८ लोक जखमी झाले.


केडिया डिस्टिलरीजची बस कर्मचाऱ्यांना घेऊन निघाली होती. बसमध्ये ४५ कर्मचारी होती. ही घटना मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. बसवरील नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी रवाना झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मृतदेह तसेच जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच दरीत कोसळलेली बस काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.


 


मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक


छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या अपघाताप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, दुर्गच्या कुम्हारीजवळ खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भरलेल्या बसला अपघात झाल्याची दुख:द माहिती मिळाली. मी ईश्वराकडे या अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांना हे दुख: सहन करण्याची ताकद मिळो अशी प्रार्थना करतो.

Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना