गौण खनिज उत्पन्नातून कोकण विभागाची विक्रमी वसुली

गत आर्थिक वर्षात १ हजार ११५ कोटींचे उत्पन्न


नवी मुंबई(मच्छिंद्र पाटील) : कोकण विभागात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात गौण खनिज उत्खनन नियमापासून तब्बल १ हजार ११५ कोटी इतकी विक्रमी रक्कम वसूल करण्यात महसूल विभागास यश आले आहे. गौण खनिज उत्खनन नियमापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी कोकण विभागाला देण्यात आलेल्या उद्दीष्टाच्या १३५.८८ टक्के वसूली करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.


शासन स्तरावरुन कोकण विभागासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता गौण खनिज उत्खनन नियमापासून ८२० कोटी रुपये उत्पन्न वसूलीचे उद्दिष्ट निश्चित करुन देण्यात आले होते. सदर उद्दिष्ट १०० टक्के साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणांनी गौण खनिज उत्खनन नियमांचे काटेकोर पालन करुन त्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या होत्या.


त्यानुसार कोकण विभागाने कालबद्ध नियोजन करुन ३१ मार्च, २०२४ अखेरपर्यंत एकूण १ हजार ११५ कोटी उत्पन्नाची वसूली साध्य केली. कोकण विभागाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले आहे.


जिल्हानिहाय उत्पन्न वसुलीची माहिती पुढीलप्रमाणे : मुंबई शहर ५३ कोटी रुपये , मुंबई उपनगर १८० कोटी, ठाणे २८८ कोटी २४ लाख, पालघर १६३ कोटी ७५ लाख, रायगड २८० कोटी ४२ लाख , रत्नागिरी ८४ कोटी ६६ लाख आणि सिंधुदूर्ग ५४ कोटी ७५ लाख इतकी वसूली करुन कोकण विभागाने गौण खनिज उत्पन्न वसूलीकरिता शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच १३५.८८ टक्के उत्पन्न साध्य केले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या